सनातनच्या सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांच्या आज्ञाचक्राचा भाग प्रकाशमान दिसणे आणि डोक्याच्या मागे प्रभावळ दिसणे यांसंदर्भात त्यांना स्वतःला अन् साधकांना आलेल्या अनुभूती

जिवाने तन, मन, बुद्धी, चित्त, अहं आणि प्रकृती यांनी निर्मित स्वतःच्या अस्तित्वाचा, म्हणजे सर्वस्वाचा त्याग केल्यावर त्याला ईश्‍वरेच्छेने कार्य करून ईश्‍वरस्वरूप होता येते. साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होऊ लागल्यावर व्यक्तीच्या देहात दैवी पालट दिसून येतात. हे दैवी पालट व्यक्तीतील वाढत्या देवत्वाची प्रचीती देतात. सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

‘साधकांनो, स्वतःत अहं वाढू न देण्यासाठी देवाप्रती क्षणोक्षणी कृतज्ञ राहूया !’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये

‘बर्‍याच वेळा लहान-सहान कृती करतांनाही साधकांतील अहं जागृत होतो. देवाकडे कर्तेपणा अर्पण करण्यासाठी, म्हणजेच स्वतःतील अहं न्यून करण्यासाठी साधकांनी पुढीलप्रमाणे प्रयत्न करावेत.

श्रद्धा आणि संत वचनावरील दृढ विश्वास यांमुळे भगवंताचे दर्शन होणे

किरातला ‘भगवंत काय असतो ?’, हेही ठाऊक नव्हते; परंतु तो संतांना प्रतिदिन नमस्कार करायचा. संतांना नमस्कार करणे आणि संतदर्शन यांचे फळ आहे की, त्याला ३ दिवसांत भगवंताचे दर्शन झाले.

ताण, निराशा, अपेक्षा आदी दोष घालवून सकारात्मकता येण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संशोधन करून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शोधून काढली आहे. यापूर्वी अनेक मनोरुग्णांना याचा लाभ झाला आहे. तसेच सनातनचे सहस्रो साधक या प्रक्रियेचा अनन्यसाधारण लाभ अनुभवत आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार्‍या मानसिक समस्यांवरील काही उपाययोजना

मन अस्थिर होणे, मनावर ताण येणे, काळजी वाटणे, भीती वाटणे, परिस्थिती स्वीकारता न येणे इत्यादी त्रास होतात. बर्‍याच जणांना नातेवाइकांतही भावनिकदृष्ट्या अडकायला होते. असे झाल्यास मानसोपचारतज्ञाचे साहाय्य घ्यावे.

दंगलसदृश भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी स्वयंसूचना देऊन मनोबल वाढवा !

आपत्काळातील पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मनोबल निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वयंसूचना-उपचारपद्धती’चा वापर करावा. त्यामुळे मनावरील ताण दूर होईल !

जीवनातील नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून आनंद मिळवा !

नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तीला व्यवहारातील सुख मिळत नाही आणि ती साधनेत आनंद मिळवू शकत नाही. या लेखात नकारात्मकतेची कारणे, नकारात्मकतेमुळे होणारे दुष्परिणाम, नकारात्मकता दूर करण्यासाठी करावयाचे उपाय इत्यादी दिले आहेत. हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.

‘दान’ या संकल्पनेविषयी पू. अनंत आठवले यांना साधिकेने विचारलेले प्रश्‍न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे

 ‘मी दान देत आहे’, अशी भावना देतांना मनात असली, तर ते ‘दान’ होईल. दानामध्ये तीन गोष्टी आल्या. ती वस्तू स्वतःची असल्याचे मानणे, म्हणजे ममत्व आले; दान देण्याचे कर्तृत्व, म्हणजे कर्तेपणा आला आणि ‘मी दान देतो’, हा अहंकार आला.

पू. भगवंतकुमार मेनराय यांनी श्वासासह नामजप जोडता यावा, यासाठी केलेले मार्गदर्शन

साधकांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांना नामजप श्वासाशी जोडायचा आहे आणि श्वास नामजपाशी जोडायचा नाही, म्हणजे नामजपाच्या लयीत श्वासोच्छ्वास करायचा नाही, तर श्वासाच्या लयीत नामजप करायचा आहे.

दान आणि अर्पण यांचे महत्त्व अन् त्यांतील भेद

‘पात्रे दानम् ।’ हे सुभाषित सर्वश्रुत आहे. दानाचा अर्थ ‘एखाद्याची मिळकत आणि त्यातून होणारा व्यय वजा करून शिल्लक रहाणार्‍या रकमेतून सामाजिक किंवा धार्मिक कार्याला केलेले साहाय्य’, असाही होतो.