॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १३ – क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग

शरीर क्षेत्र आहे आणि त्याला जाणणारा जीवात्मा क्षेत्रज्ञ आहे. सर्व क्षेत्रांमधला क्षेत्रज्ञ, म्हणजे सर्व प्राणीमात्रांमधील जीवात्मा हा ईश्वरच (ईश्वराचा अंश) आहे.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १४ – गुणत्रयविभागयोग

श्रीकृष्णांची अनन्यतेने, श्रद्धेने भक्ती करणे यामुळे त्रिगुणांचे उल्लंघन करून ब्रह्मप्राप्तीची योग्यता येते.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १५ – पुरुषोत्तमयोग

उत्तम पुरुष परमात्मा आहे आणि तिन्ही लोकांना धारण करूनही त्यांच्यापासून निर्लिप्त आहे. उत्तम पुरुषाची कास धरून आपली उन्नती करून घ्यायची आणि जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून मुक्त व्हायचे, हे आपल्या हातात आहे.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १६ – दैवासुरसंपद्विभागयोग

काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहेत; म्हणून या तिघांचा त्याग करावा. या तिघांपासून मुक्त असलेला मनुष्य आपले कल्याण होईल, असे आचरण करतो.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग

सत् हा शब्द सत्य आणि साधुत्वासाठी, तसेच उत्तम मांगलिक कार्यांसाठी योजला जातो. यज्ञ, दान अन् तप यांची स्थिती सत् असते; म्हणून परमात्म्यासाठी केलेल्या कर्मांना सत् म्हणतात.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग

परमात्म्यालाच आपले सर्वस्व मानून, ईश्‍वराचेच चिंतन करत तन-मन-धनाने आपली स्वाभाविक आणि शास्त्रविहित कर्मे ईश्‍वरालाच अर्पण करीत करणे, हे आपल्या कर्मांनीच ईश्‍वराची पूजा करणे आहे.

श्रीमद्भगवद्गीतेविषयी पाश्‍चात्त्य विद्वानांचे विचार

प्राचीन युगातील सर्व रमणीय वस्तूंमध्ये भगवद्गीतेपेक्षा श्रेष्ठ कोणतीही वस्तू नाही. गीतेत असे उत्तम आणि सर्वव्यापक ज्ञान आहे की, तिच्या रचनाकार देवास असंख्य वर्षे झाली, तरीही असा दुसरा एकसुद्धा ग्रंथ लिहिला गेला नाही.

म्हैसूर येथील हिंदुद्रोही लेखक अरविंद मलगट्टी यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर केलेले तथ्यहीन आरोप आणि त्या आरोपांचे केलेले खंडण !

गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. साधनेच्या विविध मार्गांचा उहापोह यात केला आहे. व्यष्टी आणि समष्टी स्तरावर साधना करून जीवाने स्वतःचा उत्कर्ष कसा साधून घ्यावा, याविषयी माहिती यात आहे; मात्र याच धर्मग्रंथावर काही लोक वारंवार टीका करतांना दिसतात. अरविंद मलगट्टी यांनीही गीतेवर अशाच प्रकारे टीका केली आहे. त्याचे खंडण येथे दिले आहे.   १. आरोप : … Read more

विश्ववंद्य श्रीमद्भगवद्गीता

श्रीमद्भगवद्गीता अर्थात साक्षात भगवान श्रीकृष्णाची अमृतवाणी ! कुरुक्षेत्रावरील विजयासाठी अर्जुनाला जशी गीतोपदेशाची आवश्यकता होती, तशी जीवनाच्या कुरुक्षेत्रावरील विजयासाठी आज प्रत्येकाला गीतामृताची आवश्यकता आहे.