साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सध्या संपूर्ण जग आपत्काळाच्या उंबरठ्यावर आहे. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारखी रोगराई यांसारख्या विविध माध्यमांतून आपत्काळ कधीही येऊ शकतो. आजवर देवाने आपली साधना होण्यासाठी हा काळ थोपवून धरला आहे; पण तो आज ना उद्या येणारच आहे.

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून सनातनने प्रसिद्ध केलेले ‘बालसंस्कार’ या ग्रंथमालिकेतील, तसेच अन्य ग्रंथ दिल्यास त्यांच्या मनावर सुसंस्कारांचे महत्त्व बिंबण्यास साहाय्य होईल. ‘व्यावहारिक जीवनात यशस्वी बनण्यासह गुणी अन् आदर्श होण्यासाठी काय करावे ?’, याविषयीची अमूल्य माहिती या ग्रंथांत दिली आहे.

भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्‍वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !

या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ आणि मंदिर विश्वस्त यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने भारताचा सर्वांगीण विकास आणि शत्रूंच्या नाशासाठी सामूहिक प्रार्थना केली.

भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’

भारताला अभेद्य आध्यात्मिक संरक्षककवच लाभावे आणि देशाची सर्वांगीण प्रगती होऊन पुन्हा एकदा ‘रामराज्या’चा उदय व्हावा, या संकल्पपूर्तीसाठी सनातन संस्थेच्या वतीने मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी, १७ मे २०२६ रोजी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नर्दुल्ला टँक मैदानावर दुपारी ३.३० ते सायं. ७.३० या वेळेत हा यज्ञ सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न होणार आहे.

मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना सनातन संस्थेच्या वतीने १७ मे या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण देण्यात आले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांना सनातन संस्थेच्या वतीने मुंबईत होणार्‍या श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण देण्यात आले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांसह ३ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंचा सहभाग. हिंदूंसाठी आज नाही, तर कधीच नाही अशी धोक्याची घंटा वाजली आहे ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !

आश्रम परिसरातील सर्व साहित्य सुस्थितीत रहाण्याकरता तात्पुरत्या निवारा शेड बनवायच्या आहेत. त्यासाठी फ्लेक्स, प्लास्टिक आणि ‘सिलपोलिन’ यांची, तसेच लोखंडी अन् प्लॅस्टिक पत्र्यांची (‘कॉरुगेटेड शीट्स’ची) आवश्यकता आहे…

अधिक मासात सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना देऊन सर्वश्रेष्‍ठ अशा ज्ञानदानाचे फळ मिळवा !

इतरांना देण्‍यासाठी सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ हवे असल्‍यास त्‍यांची मागणी लवकरात लवकर स्‍थानिक वितरकांकडे करावी अथवा https://sanatanshop.com/shop/ या लिंकवर नोंदवावी.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ काजल हिंदुस्थानी यांनी रामनाथी, गोवा येथील ‘सनातन आश्रमा’ला दिली सदिच्छा भेट !

गुजरातमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर’ (सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून प्रभावीपणे समाजाला दिशा देणार्‍या) काजल हिंदुस्थानी यांनी १८ एप्रिल २०२६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

वर्धा येथे सनातन संस्थेकडून डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा सत्कार

भारताला हिंदु राष्ट्र करणे, देशात गोवंश हत्याबंदीचा कायदा करणे, आपत्काळात हिंदूंचे रक्षण करणे, १ लाख ‘हनुमान चालिसा केंद्रे’ चालू करणे आदी संकल्प घेऊन ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’ तथा ‘राष्ट्रीय बजरंग दला’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा देशभर दौरा चालू आहे. या निमित्ताने ते वर्धा येथे आले असता…