धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी गाठली ६४ टक्के, तर भगवंताविषयी अपार भक्ती असलेले सनदी लेखापाल श्री. सतीशचंद्र यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

गुरुदेवांविषयी अपार श्रद्धा आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. यांनी ६४ टक्के तसेच नम्रता अन् भगवंताविषयी अपार भक्ती असलेले मंगळुरू येथील सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) श्री. सतीशचंद्र यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी भावपूर्ण वातावरणात घोषित केले.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त धर्मकार्य करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या घोषणेने आनंदाचे वातावरण !

वर्ष २०१२ पासून दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू झाल्यानंतर जीवनमुक्तीची प्रक्रिया चालू झालेली आहे. अधिवेशनात ५ संत झाले आणि आजपर्यंत ४० हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जीवनमुक्त झाले आहेत. हीच या अधिवेशनाची फलनिष्पती आहे.

भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक अन् ज्ञानमार्गानुसार साधना करणारे ठाणे येथील डॉ. शिवकुमार ओझा (वय ८५ वर्षे) संतपदी विराजमान !

भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी समर्पित भावाने अलौकिक कार्य करणारे ठाणे येथील डॉ. शिवकुमार ओझा (वय ८५ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ८ जुलै या दिवशी संतपदी विराजमान झाले.

निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी संतपदी विराजमान

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी न्यायालयीन संघर्षाचे योद्धे आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांचा अपूर्व संगम असलेले निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर हे सनातनच्या ९७ व्या व्यष्टी संतपदी, तर अधिवक्ता सुरेश कुलकर्णी हे सनातनच्या ९८ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले आहेत, अशी आनंददायी घोषणा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केली.

धर्मशास्त्रांचा अभ्यास आणि विलक्षण नम्रता असलेले डॉ. शिवनारायण सेन संतपदी विराजमान

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात १ जून या दिवशी कोलकाता (बंगाल) येथील हिंदु धर्माचे गाढे अभ्यासक डॉ. शिवनारायण सेन हे संतपदी विराजमान झाल्याचे, तर तेजपूर (आसाम) येथील श्रीमती राणू बोरा आणि हावडा (बंगाल) येथील श्री. अनिर्बान नियोगी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले.

बांगलादेशातील हिंदूंसाठी प्राणपणाने लढणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अधिवक्ता रवींद्र घोष संतपदी विराजमान !

स्वत:वर अनेक प्राणघातक आक्रमणे होऊनही त्याची पर्वा न करता इस्लामी देश असलेल्या बांगलादेशातील हिंदूंसाठी प्राणपणाने लढणारे, त्यांचे आधारस्तंभ असलेले आणि बांगलादेशचे स्वातंत्र्यसैनिक ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अधिवक्ता रवींद्र घोष (वय ६७ वर्षे) त्यांच्या निष्काम कार्यामुळे संतपदावर विराजमान झाले आहेत…

राममंदिर उभारण्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची सिद्धता असलेले कर्मयोगी अधिवक्ता हरि शंकर जैन संतपदी विराजमान !

धर्मरक्षणाची तीव्र तळमळ, निष्काम भावाने सेवारत रहाण्याची वृत्ती, उत्साहाचा अक्षय स्त्रोत आणि ध्यानी-मनी-स्वप्नी केवळ रामराज्याचा, म्हणजे हिंदु राष्ट्राचा ध्यास आदी विविध गुणांचा समुच्चय म्हणजे देहली येथील ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’ या संघटनेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अधिवक्ता हरि शंकर जैन !

बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

शांत आणि नम्र स्वभाव असलेले, प्रामाणिक वृत्तीचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तळमळ असलेले बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले.

बंगालमधील डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के, तर डॉ. कौशकचंद्र मल्लिक आणि तमिळनाडू येथील अर्जुन संपथ यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

बंगालसारख्या प्रतिकूल परिस्थितीत धर्मशास्त्राची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य करणारे शास्त्रधर्म प्रचारसभेचे सचिव डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदू अधिवेशनात घोषित केले.

चेन्नई येथील सनातनचे हितचिंतक अन् उद्योजक श्री. श्रीकांत साठे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त

मूळचे मुंबई येथील रहाणारे आणि ५० वर्षांपासून चेन्नई येथे स्थायिक झालेले सनातनचे हितचिंतक अन् उद्योजक श्री. श्रीकांत साठे (वय ७५ वर्षे) श्रीकृष्णाष्टमीच्या शुभदिनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले. त्यांच्यामध्ये असलेली काही गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात दिली आहेत.