‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ कशी राबवावी ?

१. स्वतःमधील स्वभावदोषांची सूची (यादी) बनवा ! प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते तरी दोष असतातच. शेजारी, मित्र-परिवारामध्ये एकही दोष नसलेला असा कोणी आहे का ? कोणीच नाही ना ! केवळ ईश्‍वरातच एकही दोष नाही; कारण तो सर्वगुणसंपन्न आहे. सतत आनंदात रहाणे, हा ईश्‍वराचा स्वभाव आहे. त्याच्यासारखे आनंदी होण्यासाठी कोणते दोष घालवणे आणि कोणते गुण जोपासणे आवश्यक आहे, ते पाहूया. … Read more

स्वयंसूचना कशी बनवावी ?

स्वतःकडून झालेली अयोग्य कृती, मनात आलेला अयोग्य विचार व व्यक्त झालेली किंवा स्वतःच्या मनात उमटलेली अयोग्य प्रतिक्रिया यांच्या संदर्भात स्वतःच स्वतःच्या अंतर्मनाला (चित्ताला) सूचना देणे, म्हणजे स्वयंसूचना होय.

स्वभावदोष-निर्मूलन तक्त्याचे स्वरूप

दिवसभरात घडलेल्या विविध कृती, तसेच मनात उमटलेल्या व व्यक्त झालेल्या अयोग्य प्रतिक्रिया शोधून त्यांची नियमितपणे ‘स्वभावदोष-निर्मूलन तक्त्या’त नोंद करावी.

गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे साधकांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगी मानसिक संतुलन बिघडू न देता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यावे, तसेच नेहमी आदर्श कृती व्हावी, यासाठी व्यक्तीचे मनोबल उत्तम अन् व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक असते. स्वभावदोेष व्यक्तीचे मन दुर्बल करण्यास कारणीभूत ठरतात

प्रबळ असलेले स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी साधकांनी आध्यात्मिकतेची जोड देऊन केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे सर्वच साधक स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतात. त्यासाठी प्रयत्न केल्यावर ब-याच जणांचे दोष आणि अहं यांच्या पैलूंंचे प्रमाण उणावते. त्यातून गुणांची वृद्धी होऊन त्यांना आनंदही मिळतो.

गुणसंवर्धन

व्यक्तिमत्त्व विकास करणे म्हणजे स्वतःत गुणांची वृद्धी करणे होय ! गुणांच्या विकासामुळे व्यक्ती सर्वगुणसंपन्न होऊन तिची ईश्‍वराकडे वाटचाल होऊ लागते.

भावनाशीलता या दोषावर मात करण्यासाठी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन

एखाद्या प्रसंगात मन भावनाशील होऊन रडू येते. तेव्हा मनाची पुष्कळ ऊर्जा व्यय (खर्च) होते. याचा परिणाम सेवेवर होऊन सेवेचा कालावधी अल्प होतो.

जीवनावर आणि साधनेवरही विपरित परिणाम घडवणार्‍या भीतीचा संस्कार पुसून टाकण्यासाठी सौ. श्‍वेता क्लार्क यांनी केलेले प्रयत्न आणि श्रीकृष्णाने त्यांना केलेले साहाय्य

माझ्यामधे भीती वाटणे आणि त्यासमवेतच न्यूनगंड आणि राग येणे, हे अहंचे पैलू प्रबळ आहेत. मी भीती वाटणे, या दोषाच्या मुळाशी जाऊन त्याची व्याप्ती काढू शकले. गेल्या वर्षभरात मी हा दोष घालवण्यासाठी प्रयत्न करत असून श्रीकृष्णाच्या साहाय्यामुळे आणखी योग्य दिशेने त्यावर मात करू शकत आहे.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या संदर्भात पू. उमेश शेणै यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

साधकांच्या मनात सातत्याने काही ना कारणाने विकल्प येत असतात. त्यामुळे त्यांच्या मनाची स्थिती खाली-वर होत असते. साधकांच्या केवळ वेळेचीच नव्हे, तर व्यष्टी आणि समष्टी साधनेचीसुद्धा हानी होते. याच संदर्भात पू. उमेशण्णांना केलेले अमूल्य मार्गदर्शन