स्वसंस्कृती आणि स्वधर्म यांचा विसर पडलेला समाज अन् संस्कृतीजतन आणि धर्माचरण यांस उद्युक्त करण्यासाठी प्रयत्नरत सनातन संस्था !

सध्याच्या काळात समाजातील सात्त्विकता पुष्कळच उणावली असून साधना करणे कठीण झाले आहे. समाजाला अध्यात्माचे महत्त्व सांगून समाज साधनेकडे वळावा आणि समाजातील सात्त्विकता पुनर्प्रस्थापित व्हावी, यासाठी सनातनचे साधक अन् संत प्रयत्न करत आहेत.

सनातन संस्थेच्या वतीने ठाणे आणि बदलापूर येथे ‘आदर्श गणेशोत्सव’ या विषयावर प्रवचन !

डीजेवर चित्रपटांची गाणी लावून मद्य पिऊन धांगडधिंगा करत मिरवणुका काढणे, प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणपूरक म्हणून बसवणे, मूर्तीदान करणे, जागरणाच्या नावाखाली जुगार खेळणे यांसारख्या अनेक विकृतींमुळे पावित्र्य भंग होत आहे.

नाशिक येथील तापी नदीत फेकलेल्या गणेशमूर्तींचे विधीवत पूजन करून विसर्जन

घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक यांनी तापी नदीत पूजेच्या सामानाची स्वच्छता करून फेकलेल्या गणेशमूर्ती उचलून पाण्याच्या डोहात त्याचे विधिवत पूजन अन् विसर्जन केले. त्यानंतर सनातन संस्थेच्या वतीने आरती करण्यात आली.

सनातन संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत वहात्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन

दादर चौपाटी आणि मुलुंड येथील कृत्रिम तलावाजवळ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनानिमित्त धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासंबंधी जनप्रबोधन मोहीम राबवण्यात आली.

श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन होऊ नये ! – सोलापूर येथे प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी

श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन होऊ नये, तसेच मूर्तीदान ही संकल्पना राबवू नये, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री. श्रीकांत मायकलवार यांना निवेदन देण्यात आले.

ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सनातनचा सहभाग

आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांकडून संताप व्यक्त ! श्री शनैश्‍चर देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय म्हणजे हिंदूंच्या भावनांशी खेळ ! ठाणे – मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारीकरण केले गेले. प्रत्यक्षात मात्र या मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यवधींचा डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. देवनिधी लुटणार्‍या पापी व्यक्तींना शिक्षा न देणार्‍या शासनाला श्री शनैश्‍चर देवस्थान कह्यात घेण्याचा कोणताही … Read more

सार्वजनिक उत्सव आदर्शरित्या साजरे व्हावेत, यासाठी मुंबई येथे सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिराचे आयोजन !

सार्वजनिक उत्सव आणि सण हे हिंदु धर्माचे अविभाज्य घटक आहेत. सार्वजनिक उत्सव मंडळांना उत्सवांच्या अनुमतींपासून ते प्रत्यक्ष उत्सव साजरे करेपर्यंत अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते.

धुळे, मुंबई आणि पुणे येथील ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्य आणि चैतन्य यांचा आविष्कार !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७ मे या दिवशी झालेल्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत २० मे या दिवशी धुळे, मुंबई आणि पुणे या तिन्ही ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

बोईसर आणि कोपरखैरणे येथे मंदिरांची स्वच्छता !

बोईसर येथील हनुमान मंदिराची स्वच्छता धर्मप्रेमी आणि साधक यांनी केली. या वेळी मंदिर विश्‍वस्तांनी मंदिरात साकडे घालण्यासाठी अनुमती दिली. कोपरखैरणे येथील श्री चिकानेश्‍वर शिव मंदिराचीही स्वच्छता करण्यात आली.

जळकोट (जिल्हा नांदेड) येथे सनातन संस्थेकडून भागवत सप्ताहात मार्गदर्शन

जळकोट – येथील सनातन संस्थेचे हितचिंतक आणि विज्ञापनदाते, तसेच जळकोट पंचायत समितीचे बांधकाम सभापती श्री. रमाकांत रायवार यांनी आयोजिलेल्या भागवत सप्ताहात सनातन संस्थेच्या सौ. अनिता बुणगे यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले होते.