हिंदु राष्ट्र जागृती अभियानामुळे भारतभरातील हिंदूंमध्ये नवचैतन्य !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत कार्य करणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात श्रीरामनवमीपासून (१०.४.२०२२ पासून) ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे.

कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !

या दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले. या फेरीत वारकरी संप्रदाय, ‘इस्कॉन’, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ, श्री संप्रदाय यांच्यासह विविध संप्रदाय सहभागी झाले होते.

हिंदूंच्या एकसंघ शक्तीचा आविष्कार दर्शवण्यासाठी १५ मे या दिवशी चिपळूण येथे हिंदू एकता दिंडी !

‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मरक्षणासाठी जात-पात, संप्रदाय, संघटना, पक्ष आदी भेदांच्या पलीकडे जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंच्या या संघटित शक्तीचा आविष्कार दर्शवण्याकरता या एकता दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे.

फोंडा येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले !

हिंदूऐक्याचा आविष्कार दर्शवणारी ही सांप्रदायिक एकता सदैव हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी वारंवार दिसून आली पाहिजे.

गोव्यात झालेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी पोप यांनी क्षमा मागितली पाहिजे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

जगभरातील ‘इन्क्विझिशन’विषयी पोप यांनी त्या त्या देशांत जाऊन क्षमा मागितली; मात्र गोव्यातील ‘इन्क्विझिशन’विषयी गोमंतकियांची क्षमा अद्याप मागितलेली नाही. पोप यांनी गोव्यात झालेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी गोव्यासह सर्वत्रच्या हिंदु नागरिकांनी केली पाहिजे.

भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी हिंदूंनी त्याग न केल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गेल्या ८ वर्षांत राम मंदिर निकाल, ३७० कलम आणि तिहेरी तलाक रहित करणे अशा अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या; मात्र ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित करणे’ हे समस्त हिंदू बांधव, हिंदु संघटना आणि हिंदू नेते यांच्यापुढील मोठे आव्हान आहे.

हिंदूंनी स्वत:चा धर्म जपण्यासाठी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासह कायदेशीर लढाई लढावी ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘अक्षय्य तृतीया’ हा हिंदु सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी हिंदु परंपरेनुसार मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते; मात्र या निमित्ताने ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड’ने अक्षय्य तृतीयेच्या नावाखाली जणू ‘रमझान’चेच विज्ञापन करत

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून व्यापक प्रमाणात धर्मप्रसार !

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रवचन, फलकप्रसिद्धी, सामूहिक गुढी, सामाजिक माध्यम यांद्वारे व्यापक प्रमाणात धर्मप्रसार करण्यात येत आहे. या कार्यात धर्मप्रेमींचा कृतीशील सहभाग आहे.

हिंदु धर्म समजून घेऊन स्वत:च्या कुटुंबावर धर्माचे संस्कार करणे आवश्यक ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु स्त्री धर्मशिक्षित असल्यास तिचे पूर्ण कुटुंब धर्माचरणी होते, हे राजमाता जिजाऊंनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळे हिंदु स्त्रियांनी पाश्चात्त्यांचे अंधानुकरण न करता हिंदु धर्म समजून घेऊन स्वत:च्या कुटुंबावर धर्माचे संस्कार करणे आवश्यक आहे. असे झाल्यास ‘लव्ह जिहाद’सारख्या संकटापासून कुटुंबाचे रक्षण होईल.

‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या पाश्चात्त्य विकृतीला देशातून हद्दपार करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – सद्गुरु (सुश्री(कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘व्हॅलेंटाईन डे’च्या वाढत्या कुप्रथेविषयी राष्ट्रप्रेमी, हितचिंतक आणि जिज्ञासू यांचे ‘ऑनलाईन’ व्याख्यानातून प्रबोधन