हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी उपास्यदेवतेचा किंवा ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप प्रतिदिन अधिकाधिक करा !

हिंदूंनो, अनेक पिढ्यांच्या संघर्षानंतर श्रीरामाच्या कृपेमुळे आपल्या पिढीला श्रीराम त्याच्या जन्मभूमीत विराजमान झालेला बघायला मिळत आहे. इतक्यावर आनंद मानणे योग्य रहाणार नाही. ‘हिंदु राष्ट्र’ हेच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय आहे. यासाठी आध्यात्मिक स्तरावरही प्रयत्न होणे आवश्यक आहेत – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, हा सूक्ष्मातून रामराज्याचा, म्हणजेच हिंदु राष्ट्राचा प्रारंभ !

अयोध्येत उभारलेल्या भव्यदिव्य श्रीराममंदिरात २२.१.२०२४ या दिवशी श्री रामललांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठेमुळे अयोध्येतून साक्षात् श्रीरामाची स्पंदने भारतातच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवर नियमित रूपात प्रक्षेपित होणार आहेत. हे एकप्रकारचे प्रभु श्रीरामाचे सूक्ष्मातील अवतरण आहे.

माघी श्री गणेश जयंती (Ganesh Jayanti 2024)

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते.

श्री दश महाविद्यां’च्या यंत्रांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा अष्टांगसाधनेशी संबंध

‘नवरात्रीच्या काळामध्ये देवीची उपासना प्रामुख्याने करतात. आदिशक्ती माता दुर्गेची दहा रूपे ‘श्री दश महाविद्या’ या नावाने सर्वांनाच परिचित आहेत. ही सर्व पार्वती देवीची १० रूपे आहेत. ती तिच्या १० पैलूंचा, म्हणजे वैशिष्ट्यांचा (कार्यांचा) समूह आहे.

शूरांचे दैवत स्कंद म्हणजेच खंडोबा आणि चंपाषष्ठी

महाराष्ट्रातील कित्येक घराण्यांचे कुलदैवत खंडोबा हे आहे. क्षत्रिय बाण्याचा देव म्हणून मराठ्यांना हा विशेष प्रिय वाटतो. ‘जयाद्रि माहात्म्य’ यात या खंडोबादेवाचे महत्त्व वर्णन केले आहे. रामोशी, धनगर जातीचे लोक हेही खंडोबाची उपासना करतात. प्राणीवर्गांत कुत्र्याच्या रूपात खंडोबा वास करतो, अशी समज आहे.

करवीर निवासिनी महालक्ष्मीचे माहात्म्य !

‘काशी क्षेत्राहून जवभर सरस असणारे, मनुष्याला ऐहिक सुख आणि मुक्ती देणारे करवीर क्षेत्र इ.स. पूर्व ५ व्या किंवा ६ व्या शतकातील आहे’, असे मानले जाते. श्री महालक्ष्मीची मूर्ती ज्या हिरकखंडमिश्रित रत्नशिलेची बनवली आहे, त्यावरूनही या देवालयाची प्राचीनता सिद्ध होते.

थोर गणेशभक्त मोरया गोसावी आणि गाणपत्य संप्रदाय

‘गाणपत्य’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या संप्रदायामध्ये श्री गणपतीला परब्रह्म, परमात्मा कल्पिले असून त्यापासून इतर देवदेवतांची उत्पत्ती झाली आहे, अशी श्रद्धा आहे.

श्रीविष्णुसहस्रनाम सर्वसामान्यांपर्यंत कसे पोचले ? याविषयीची सुरस माहिती

सहदेव आणि व्यास जिथे त्यांनी भीष्म पितामह यांना विष्णुसहस्रनाम म्हणतांना ऐकले होते, त्याच ठिकाणी खाली बसले. सहदेवाने स्फटिकाद्वारे ध्वनीलहरींद्वारे विष्णुसहस्रनाम प्राप्त करण्यासाठी शिवाचे ध्यान आणि प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. स्फटिकाची प्राकृतिक रचना शांत वातावरणामध्ये ध्वनी हस्तगत करू शकेल, अशी असते

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची चैतन्यमय वातावरणात प्रतिष्ठापना !

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या आश्रमात नुकतीच श्रीराम शाळिग्रामाची प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली. सप्तर्षींच्या आज्ञेने प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम शाळिग्रामावर गुलाबजल आणि दूध यांचा अभिषेक करण्यात आला.

बसलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे चित्र आणि सनातन-निर्मित उभ्या असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे चित्र यांच्या संदर्भातील प्रयोग

सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीच्या चित्रात ती उभी दाखवली आहे. अनेकदा हितचिंतक आणि साधक या चित्राच्या संदर्भात पुढील सूत्र सुचवतात, श्री लक्ष्मीदेवी उभी न दाखवता ती बसलेली हवी.