…तरच भारत महासत्ता बनू शकेल !

‘१९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानच्या साहाय्यासाठी नौसेना पाठवू इच्छिणार्‍या चीनचा कपटी कावा लक्षात ठेवून अर्थकारणाची पावले उचलल्यासच भारत महासत्ता बनू शकेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भक्तीयोग आणि समष्टी सेवा

‘भक्तीयोगानुसार साधना करतांना सर्वांत ईश्‍वर पहाता आल्यावर समष्टी सेवा होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.६.२०२१)

देव आणि आई-वडील यांतील साम्य !

‘आई-वडील मुलाचे लाड करतात आणि नीट वागत नसला, तर त्याला मारतातही. देवाचेही असेच असते. तो सर्वसाधारण भक्ताला भरभरून देतो आणि साधना नीट करत नसल्यास त्याला शिक्षाही करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.६.२०२१)

कैद्यांमधील सत्त्वगुण वाढवण्यासाठी साधना शिकवली पाहिजे !

‘सत्त्व, रज आणि तम’ या त्रिगुणांचा मूलभूत सिद्धांत जगाला सांगणार्‍या भारतातच तुरुंगातील कैद्यांमधील रज-तम अल्प करून त्यांचा सत्त्वगुण वाढवण्यासाठी साधना शिकवली जात नाही. हे भारतासाठी लज्जास्पद होय ! – परात्पर गुरु डॉ. आठवले (१२.६.२०२१)

पोलिसांनो, साधना करण्याचे महत्त्व जाणा !

‘दिवसभर रज-तम प्रधान गुन्हेगारांच्या समवेत राहिल्याने बहुतांश पोलिसांत रज-तम गुण अधिक असतात. पोलीस साधना करत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांवरही अनिष्ट परिणाम होत आहे. या रज-तमचा प्रभाव अल्प होण्यासाठी त्यांनी प्रतिदिन जप साधना करणे आवश्यक आहे. आगामी घोर आपत्काळात पोलिसांनाच भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी त्यांनी आतापासूनच कठोर साधना करणे आवश्यक आहे.’ – परात्पर गुरु … Read more

साधना करणा-या कुटुंबांमध्येच साधकांप्रमाणे खरी कुटुंबभावना निर्माण होईल !

‘एकत्र-कुटुंब पद्धतीतील व्यक्ती सात्त्विक असतील, तरच एकत्र राहिल्यामुळे त्यांना आश्रमात राहिल्याप्रमाणे समष्टीचा लाभ होतो; परंतु सध्याच्या काळात असे कुटुंब बघायला मिळणे दुर्लभ झाले आहे. आई, वडील, मुलगा, सून अशा चार व्यक्तींचे छोटे कुटुंब असले, तरी चार जणांची चार मते असतात. सर्वजण साधना करायला लागले की, त्यांच्यात आश्रमातील साधकांप्रमाणे खरी कुटुंबभावना निर्माण होईल.’ – (परात्पर गुरु) … Read more

विज्ञान आणि अध्यात्मातील फरक

‘सध्याच्या काळात विज्ञानाने पुष्कळ प्रगती केली आहे’, असे सांगितले जाते. त्याचे एक उदाहरण म्हणून ‘विविध आजारांवर उपाय म्हणून ‘ॲलोपॅथी’ने विविध औषधांचा शोध लावला आहे’, असेही सांगितले जाते; परंतु विज्ञान ‘एखादी घटना घडण्याचे मूळ कारण शोधणे किंवा ‘ॲलोपॅथी’च्या दृष्टीकोनातून आजार होण्याचे मूळ कारण शोधणे आणि त्या मूळ कारणांवर उपाययोजना सांगणे’, करू शकत नाही. त्यामुळेच अनेकांना ‘एखाद्या … Read more

ईश्वरप्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?

‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्‍वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

खरे गुरु शिष्याकडून साधनेची प्रत्यक्ष कृती करून घेतात !

‘हे करा, ते करू नका’, असे बोलणारे अनेक जण असतात; पण ते तशी कृती किती जणांकडून करवून घेतात ? याउलट खरे गुरु शिष्याकडून ‘तन, मन आणि धन यांचा त्याग करायला शिकवणारी कृती’ करून घेतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्वराशी एकरूपता !

‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले