देवळाचे महत्त्व

देवळाचे महत्त्व : शक्ती आणि चैतन्य यांचे स्त्रोत !
देवळाचे महत्त्व : शक्ती आणि चैतन्य यांचे स्त्रोत !

देवळामुळे दशदिशा चैतन्यमय होतात. देवळात दर्शनाला गेल्याने आपल्याला तेथील सात्त्विकता ग्रहण करता येते आणि देवतेप्रती भक्तीभाव वाढण्यास साहाय्य होते. भक्तीयोगानुसार आणि ज्ञानयोगानुसार देवळाचे महत्त्व याविषयीची माहिती आपण या लेखात जाणून घेऊ.

१. भक्तीयोगानुसार महत्त्व

अ. देवळात दर्शनाला गेल्याने तेथील सात्त्विकता ग्रहण करता येते. तसेच तेथील सात्त्विक वातावरणामुळे देवतेप्रती भक्तीभाव वाढण्यास साहाय्य होते.

आ. देवळात पूजा, अभिषेक इत्यादी धार्मिक विधींच्या वेळी, तसेच आरतीच्या वेळी देवतेची पवित्रके (देवतेचे सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकण) देवतेच्या मूर्तीकडे मोठ्या प्रमाणावर आकृष्ट होतात. त्यामुळे त्या वेळी देवळात उपस्थित असलेल्या भाविकाला त्या पवित्रकांचा लाभ होतो.

इ. स्वयंभू किंवा जागृत देवस्थाने (उदा. बारा ज्योतिर्लिंगे), तसेच संतांनी बांधलेली देवळे यांमध्ये शक्ती आणि चैतन्य यांचे प्रमाण जास्त असल्याने अशा देवळांत दर्शनाला जाणे भाविकांना अधिक लाभदायक ठरते.

 

संतांनी बांधलेल्या देवळात गेल्यावर
तेथील शक्ती आणि चैतन्य यांमुळे आलेली अनुभूती

गोंदवले येथील श्रीरामाच्या देवळातील शक्ती आणि चैतन्य यांमुळे प्रथम त्रास होणे, नंतर डोक्यावर असलेला दाब घटणे अन् आपोआप नामजप चालू होणे

गोंदवले येथील श्रीराम मंदिर
गोंदवले येथील श्रीराम मंदिर

‘१३.१०.२००४ या दिवशी आम्ही मिरजेहून गोंदवले येथे गेलो. तेथे प.पू. गोंदवलेकर महाराजांनी बांधलेल्या श्रीरामाच्या देवळात पाऊल ठेवल्या ठेवल्या मला जांभया येऊ लागल्या. माझे डोळे लालसर झाले. नंतर माझ्या डोक्यावर असलेला दाब न्यून झाल्यासारखे वाटले आणि माझा नामजप आपोआप चालू झाला. ‘संतांनी बांधलेल्या देवळात किती शक्ती आणि चैतन्य असते’, याची अनुभूती मला आली.’ – एक साधिका

(साधिकेला वाईट शक्तीचा त्रास होता. देवळातील सात्त्विक शक्ती आणि चैतन्य साधिकेतील वाईट शक्तीला सहन न झाल्याने तिचे प्रकटीकरण चालू झाले. परिणामस्वरूप साधिकेला जांभया येऊन त्यांद्वारे तिच्यातील काळी शक्ती बाहेर पडण्यास आरंभ झाला. साधिकेतील वाईट शक्ती प्रकट होण्याचा प्रयत्न करत असल्याने तिचे डोळे लालसर झाले.)

 

२. ज्ञानयोगानुसार महत्त्व

‘द्रष्टा दृश्यवशात् बद्ध: । दृश्याभावात् विमुच्यते ।’, म्हणजे ‘द्रष्टा (जीव) हा दृश्यामुळे बद्ध होतो आणि ज्या वेळी दृश्याचा अभाव होईल, त्या वेळी तो मुक्त होतो’, उदा. आवडीचा पदार्थ समोर दिसत असतांना तो खायची इच्छा होते, इतर वेळी तसे होत नाही. दृश्ये तर एकापाठोपाठ एक अशी येतच असतात. मग दृश्याचा अभाव केव्हा होणार ? त्या द्रष्ट्याला मुक्त होण्यास एकच मार्ग संभवतो आणि तो म्हणजे द्रष्ट्यापुढे अशी दृश्ये ठेवायची की, त्या दृश्यांशी बद्ध झाला असता त्याला मुक्त व्हायला साहाय्य होईल, म्हणजे त्याची वृत्ती तमातून रजात आणि रजातून सत्त्वात प्रवेश करत राहील. ज्या दृश्यांमुळे बद्ध असलेला द्रष्टा मुक्त होईल, अशांपैकी एक दृश्य म्हणजे ‘देवालय’. देवालयांत अध्यात्मवृत्तीला पोषक अशी ईश्वरावतारांच्या जन्मकर्मांचे आणि लीलांचे, तसेच त्याच्या भक्तांचेही गुणगान ज्यात केलेले आहे, अशी प्रवचने आणि भजने होतात. त्यांच्या श्रवणातून ऐकणार्‍यांचे मनन घडून त्याची परिणती निदिध्यासात होते आणि त्यामुळे आत्मसाक्षात्कार होण्यास साहाय्य होते.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

 

३. देवळामुळे दशदिशा चैतन्यमय होणे

‘देऊळ हे प्रत्यक्ष ईश्वरी ऊर्जेचे आकर्षण, प्रक्षेपण आणि संचारण यांचे केंद्र असल्यामुळे देवळातून सतत ईश्वरी ऊर्जेचे आकर्षण होऊन ती सर्व दिशांत प्रक्षेपण करून सगुण रचनाक्षेत्रात संचारणाच्या माध्यमातून वायूमंडल आणि जीव यांची शुद्धी केली जाते.’ – एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ४.१.२००७, सायंकाळी ६.५३)

अ. अधोदिशा : ‘देवळाच्या पायाभरणीच्या वेळी करण्यात येणार्‍या शिलेच्या स्थापनेतून देवळाच्या अधोदिशेचे वायूमंडल चैतन्यलहरींनी युक्त होते.

आ. अष्टदिशा : देवळातील देवतेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळे अष्टदिशा चैतन्यमय बनतात.

इ. ऊर्ध्वदिशा : देवळाच्या कळसातून कारंज्याप्रमाणे प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे त्याच्या सभोवतालच्या परिसरातील ऊर्ध्वदिशेचे वायूमंडल शुद्ध होते. तसेच या लहरींमुळे दाही दिशांनी प्रवेश करणार्‍या वाईट शक्तींपासून गावाचे रक्षण होण्यास साहाय्य होते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १४.१.२००५)

 

देवळाचे महत्त्व स्पष्ट करणारे श्री क्षेत्र कुणकेश्वर
(सिंधुदुर्ग) येथील शिवपिंडीची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

४. ग्रहणाच्या वेळी पृथ्वीकडे येणार्‍या काळ्या शक्तीने भारित रजतमात्मक लहरी
हिंदूंच्या देवळांमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ५ कि.मी. अंतरावर असतांनाच नष्ट होणे
आणि काही पंथांच्या प्रार्थनास्थळांद्वारे ग्रहणकाळातील रज-तमात्मक लहरी ग्रहण केल्या जाणे

‘ग्रहणाच्या काळात पृथ्वीवर काळ्या शक्तीने भारित रज-तमात्मक लहरी येत असतात. हिंदूंच्या देवळांतील देवतांच्या मूर्तींकडून प्रक्षेपित होणारे देवतांचे तत्त्व, चैतन्य, सात्त्विकता आणि मारक शक्ती यांमुळे या रज-तमात्मक लहरी पृथ्वीपासून ५ कि.मी. अंतरावर असतांनाच नष्ट होतात आणि त्यांचा पृथ्वीवर होणारा अनिष्ट परिणाम उणावतो. याउलट काही पंथांच्या प्रार्थनास्थळांमध्ये काळ्या शक्तीचा साठा असल्याने त्यांच्याकडून सातत्याने रज-तम लहरींचे प्रक्षेपण होत असते. ग्रहणकाळात प्रक्षेपित होणार्‍या काळ्या शक्तीने भारित रज-तमात्मक लहरी या प्रार्थनास्थळांद्वारे त्वरित ग्रहण केल्या जातात आणि या प्रार्थनास्थळांमधील काळ्या शक्तीचा साठा ५ ते १० टक्क्यांनी वाढतो.’ – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ४.१०.२००५, दुपारी २.५० ते ३.०८)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘देवळात दर्शन कसे घ्यावे ?’

Leave a Comment