वास्तू आणि वाहन यांची शुद्धी कशी कराल ?

वास्तूतील अयोग्य आणि त्रासदायक स्पंदने दूर करून त्यात चांगली स्पंदने निर्माण करणे म्हणजे शुद्धी करणे होय. वास्तूत कोणताही दोष राहू नये म्हणून हल्ली बांधकाम व्यावसायिक अन् ग्राहक वास्तूशास्त्राचा गांभीर्याने विचार करत आहेत. मात्र या क्षेत्रातही भ्रष्ट व्यक्तींनी शिरकाव केल्याने वास्तूशुद्धीसाठी अनावश्यक खर्चिक विधी करणे, वास्तूच्या रचनेत फेरबदल करणे, असे गैरप्रकार वाढत आहेत. हे टाळण्यासाठी वास्तूदोषामुळे होणार्‍या दुष्परिणामांची काही उदाहरणे आणि वास्तूदोष दूर करण्याच्या इतर प्रचलित पद्धतींपेक्षा कमी खर्चिक अन् सुलभ पद्धती पुढे दिल्या आहेत.

 

वास्तूशुद्धी करणार्‍याने वास्तूशुद्धी करण्यापूर्वी
१५ मिनिटे श्री गणेशाचा वा उपास्यदेवतेचा नामजप करावा !

वास्तूशुद्धी करतांना उपास्यदेवतेचा नामजप मनातल्या मनात वा मोठ्याने करावा; शिवाय वास्तूशुद्धी करण्यापूर्वीही नामजप करणे श्रेयस्कर ठरते. याचे कारण याप्रमाणे आहे – संपूर्ण वास्तूतील वाईट शक्तींचे निर्मूलन करणे, हे एक प्रकारे वाईट शक्तींना दिलेले मोठे आव्हानच असते. त्यामुळे वास्तूशुद्धी करतांना वाईट शक्तींचा विरोध होण्याची शक्यताही अधिक असते. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला आध्यात्मिक त्रास होऊ शकतो. तो होऊ नये किंवा आपली प्राणशक्ती घटून थकवा येऊ नये, यांसाठी वास्तूशुद्धीपूर्वी १५ मिनिटे श्री गणेशाचा वा उपास्यदेवतेचा नामजप करणे विशेष लाभदायक असते. श्री गणेशाच्या नामजपामुळे प्राणशक्ती वाढते.

 

वास्तूशुद्धी आरंभ करण्यापूर्वी प्रार्थना करावी !

वास्तूशुद्धी आरंभ करण्यापूर्वी उपास्यदेवतेला प्रार्थना करावी, हे देवते, तुझ्या कृपेने माझ्याभोवती (स्वतःचे नाव उच्चारावे) संरक्षक-कवच निर्माण होऊ दे, तसेच या वास्तूमधील वाईट शक्तींचे अस्तित्व आणि वाईट स्पंदने नष्ट होऊ देत. वास्तूशुद्धी करत असतांना मध्ये मध्येही प्रार्थना करावी.

 

वास्तूदोषामुळे होणार्‍या दुष्परिणामांची काही उदाहरणे

अ. शारीरिक

पोटाचे विकार, संधिवात, अपंगत्व वगैरे शारीरिक आजार.

आ. मानसिक

काळजी, निराशा वगैरे मानसिक आजार.

इ. आर्थिक व कौटुंबिक

सातत्याने आर्थिक नुकसान होणे, घरात भांडणे होणे.

ई. आध्यात्मिक

नामजपात अडथळे येणे, वाईट शक्‍तींचे अस्तित्व जाणवणे

 

वास्तूशुद्धीच्या काही सुलभ पद्धती

१. अडगळ काढणे

वास्तूशास्त्रानुसार प्रत्येक घरात, प्रत्येक खोलीत सुमारे ४७ टक्के वस्तू अनावश्यक असतात. या अनावश्यक वस्तू तेथून बाहेर काढाव्यात आणि उर्वरित वस्तूंची योग्य रचना करावी.

 

२. विभूती फुंकणे

तीर्थक्षेत्राची अथवा यज्ञाची विभूती वास्तूतून बाहेरच्या दिशेने फुंकरावी. विभूतीतील सात्त्विकतेचा वाईट शक्‍तींना त्रास होतो आणि त्यामुळे त्या दूर पळतात. वास्तूत विभूतीयुक्‍त तीर्थ शिंपडल्यास त्याचा परिणाम अधिक काळ टिकतो.

 

३. गोमूत्र शिंपडणे

गोमूत्र शिंपडतांना
गोमूत्र शिंपडतांना

 

वास्तूमध्ये गोमूत्र शिंपडल्याने वास्तूतील वाईट शक्‍तींच्या त्रासाचे निवारण होते. गोमूत्राचे धार्मिक विधींमध्ये आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजेच गोमूत्र हे आरोग्यदायी अन् आध्यात्मिकदृष्ट्याही लाभदायी असते. गोमूत्र न मिळाल्यास पाण्यात उदबत्तीची विभूती घालून ते पाणी शिंपडावे. गोमूत्र किंवा विभूतीचे पाणी शिंपडतांना ते प्रदक्षिणेच्या उलट दिशेने शिंपडावे.

सर्वसाधारणतः वास्तूशुद्धीची कृती (उदा. गोमूत्र शिंपडणे) वास्तूत उजवीकडून डावीकडे या मार्गाने (प्रदक्षिणेच्या उलट मार्गाने) भिंतींच्या कडेकडेने फिरत करावी !

वास्तूतील त्रासदायक स्पंदने नष्ट करणे, हा वास्तूशुद्धीचा उद्देश असतो. याचाच अर्थ, वास्तूशुद्धी हे एक प्रकारचे मारक स्वरूपाचे कार्य आहे. हे कार्य अधिक परिणामकारक होण्यासाठी वास्तूत गोमूत्र शिंपडणे, कडुलिंबाच्या पानांची धुरी दाखवणे, धूप वा उदबत्ती फिरवणे, विभूती फुंकरणे यांसारख्या वास्तूशुद्धीच्या कृती वास्तूत उजवीकडून डावीकडे या मार्गाने (प्रदक्षिणेच्या उलट मार्गाने), तसेच भिंतींच्या कडेकडेने फिरत कराव्यात.

वास्तूशुद्धीच्या कृती वास्तूत उजवीकडून डावीकडे या मार्गाने (प्रदक्षिणेच्या उलट मार्गाने) केल्याने वातावरणाची शुद्धी होण्याचे प्रमाण वाढणे

वास्तूशुद्धीच्या कृती उजवीकडून डावीकडे या मार्गाने (प्रदक्षिणेच्या उलट मार्गाने) केल्याने वातावरणातील ईश्‍वराची मारक शक्ती जागृत होते. ही शक्ती वायूमंडलातील रज-तमयुक्त स्पंदनांना त्वरित नष्ट करू शकते; कारण मारक स्पंदनांची फिरण्याची गती ही उजवीकडून डावीकडे या मार्गानेच असते आणि नेमक्या या गतीचा उपयोग करून त्याच पद्धतीने वास्तूशुद्धीची कृती केल्यामुळे वातावरणाची शुद्धी होण्याचे प्रमाण वाढते.

४. धूप करणे

धूप दाखवणे
धूप दाखवणे

वास्तूत धूप किंवा सात्त्विक उदबत्ती लावावी किंवा कडुनिंबाच्या पानांची धुरी दाखवावी.

काही चांगल्या शक्‍ती या वायुरूप आणि सुगंधाने आकर्षित होणार्‍या असतात. धूप केल्याने या चांगल्या शक्‍ती वास्तूत आकर्षित होतात अन् त्यामुळे वास्तू सात्त्विक बनते. तसेच धूप केल्याने काही वाईट शक्‍ती वास्तूतून दूर जातात. धुपातून प्रक्षेपित होणार्‍या रजोगुणी, तसेच पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित लहरींमुळे वास्तूतील कनिष्ठ देवतांच्या लहरी कार्यरत होण्यास साहाय्य होते. प्रथम कनिष्ठ देवतांना संतुष्ट केल्यामुळे वास्तूतील वाईट शक्तींच्या संचारावर नियंत्रण येण्यास साहाय्य होते.

 

५. नामजप करणे

वास्तूच्या शुद्धीसाठी आपल्या उपास्यदेवतेला आणि वास्तूदेवतेला प्रार्थना करून नामजप करावा. स्थूलातील वरील ४ उपायांपेक्षा नामजप अधिक सूक्ष्म, म्हणजेच अधिक प्रभावी असल्याने त्याने सर्वाधिक लाभ होतो.

अ. सनातन संस्थेचे प्रेरणास्रोत प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली भजने किंवा ती उपलब्ध नसल्यास अन्य संतांच्या आवाजातील भजने लावावीत.

६. देवतांच्या नामजपाच्या पट्ट्या लावणे

नामजपाचे सतत स्मरण व्हावे यासाठी आपल्या नजरेसमोर देवतेच्या नामजपाच्या पट्ट्या लावणे उपयुक्‍त ठरते. सनातनने बनवलेल्या अशा पट्ट्यांतील नामजपातील अक्षरे आणि बाजूची किनार अशा रीतीने बनवण्यात आली आहे की, त्यांतून त्या त्या देवतेची स्पंदने अधिकाधिक प्रमाणात येतात. बर्‍याचदा वास्तूचे किंवा वास्तूतील खोलीचे छत हे उतरते असते, म्हणजेच जमिनीच्या पातळीशी समांतर नसते. इमारतींमधील खोल्यांच्या तुलनेत कौलारू घरांच्या बाबतीत ही शक्यता अधिक असते. यामुळे वास्तूत अयोग्य स्पंदने तयार होतात. यावर उपाय म्हणून देवतांच्या नामपट्ट्या खोलीतील बाजूच्या भिंतींवर अशा प्रकारे एका रेषेत लावाव्यात की, त्या नामपट्ट्यांमुळे जमिनीच्या पातळीशी समांतर असे सूक्ष्मातील छत निर्माण होईल. नामपट्ट्यांतून निघणार्‍या चैतन्यलहरी जास्त प्रमाणात जमिनीला समांतर आणि समोर जात असल्यामुळे हे सूक्ष्म-छत तयार होते. यामुळे वास्तूत चांगली स्पंदने निर्माण होतात आणि वास्तूचे रक्षण होते. पुढे दिलेल्या आकृत्यांवरून हे अधिक लक्षात येईल.

नामपट्ट्यांचे वास्तू-छत
नामपट्ट्यांचे वास्तू-छत

 

घराच्या भिंती उपदिशांना असल्यास वास्तू-छत करण्याची पद्धत

घराच्या भिंती पूर्व, पश्‍चिम आदी मुख्य दिशांना समांतर नसून आग्नेय, नैऋत्यादी उपदिशांना समांतर असल्यास दोन भिंतींच्या मध्यभागी दोरी लावून नामपट्ट्यांद्वारे वास्तू-छत तयार करावे.

कौलारू घरांप्रमाणे बर्‍याचदा वास्तूचे किंवा वास्तूतील खोलीचे छत हे भूमीशी समांतर नसल्याने वास्तूत अयोग्य स्पंदने निर्माण होतात. यावर उपाय म्हणून देवतांच्या नामपट्ट्या प्रत्येक खोलीच्या भिंतींवर वरील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एका रेषेत लावाव्यात. यामुळे नामपट्ट्यांतून निघणार्‍या चैतन्यलहरी भूमीला समांतर आणि समोर जात असल्यामुळे वास्तूत सूक्ष्म-छत निर्माण होऊन वास्तूचे रक्षण होते. नामपट्ट्या लावतांना दोन पट्ट्यांमधील अंतर १ मीटरपेक्षा जास्त असू नये.

घराच्या भिंती उपदिशांना असल्यास वास्तू-छत लावण्याची पद्धत

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

वास्तूशुद्धी-संचाची सात्त्विकता ‘लोलक चिकित्सा-पद्धती’द्वारे सिद्ध !

‘आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेल्या ‘लोलक चिकित्सा-पद्धती’द्वारे विविध वस्तू, वातावरण, व्यक्‍ती इत्यादींमधील सकारात्मक अथवा नकारात्मक शक्‍तीचे अस्तित्व ओळखता येते. सकारात्मक शक्‍ती असल्यास लोलक घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरतो, तर नकारात्मक शक्‍ती असल्यास तो घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो.

वास्तूशुद्धी-संचाच्या संदर्भात एका साधकाने लोलकाचा पुढीलप्रमाणे प्रयोग केला मी वास्तूच्या दोन प्रतिकृती तयार केल्या. एका प्रतिकृतीमध्ये वास्तूशुद्धीसंचातील नामपट्ट्या लावल्या. दुसर्‍या प्रतिकृतीमध्ये काहीच केले नाही. यानंतर आळीपाळीने दोन्ही वास्तूंवर लोलक धरला. नामपट्ट्या लावलेल्या वास्तूवर धरलेला लोलक सकारात्मक स्पंदने दाखवत होता, तर नामपट्ट्या न लावलेल्या वास्तूत तो नकारात्मक स्पंदने दाखवत होता. यावरून नामपट्ट्यांची सात्त्विकता सिद्ध होते.’

– श्री. प्रकाश करंदीकर, सनातन संस्था.

 

धर्मशास्त्रानुसार वास्तूशुद्धी करायलाच हवी, हे लक्षात घ्या !

पू. राजेंद्र शिंदे
पू. राजेंद्र शिंदे

काही साधक नवीन वास्तूत प्रवेश करतांना ‘आमच्याकडे नियमितपणे साधकांचे येणे-जाणे असते, सत्संगही होत असतात. तेव्हा आम्ही वास्तूशुद्धी केली नाही, तरी चालेल का ?’, असे विचारतात. अशा वेळी त्यांनी पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावा.

१. त्यांच्या वास्तूत नियमितपणे येत असलेल्या साधकांमध्ये अनेक हौशे-गौशे आणि कार्यकर्तेही असतात. त्यांचा आध्यात्मिक स्तर आपल्याला माहीत नसतो. त्यामुळे त्यांच्या येण्याने अपेक्षित अध्यात्मिक लाभ होईलच, असे नाही.

२. एखाद्या वास्तूमध्ये संत अथवा ६० टक्के पातळीचे साधक कायम रहात असतील, तर त्या ठिकाणी वास्तूशुद्धी करण्याची आवश्यकता नसते.

३. एखाद्या संतांनी सांगितले ‘नको’, तर वास्तुशुद्धी करू नये; कारण तेथे त्या संतांचा संकल्प कार्यरत होतो.

४. धर्मशास्त्रानुसार वास्तूशुद्धी केल्याने वास्तू शुद्ध झाल्याने साधना चांगल्या तर्‍हेने व्हायला साहाय्य होते.

– श्री. राजेंद्र शिंदे (सनातनचे ६ वे संत पू. राजेंद्र शिंदे), सनातन आश्रम, देवद

 

 

वाहनशुद्धीच्या काही सुलभ पद्धती

चारचाकी वाहनातील नामपट्ट्यांची रचना

वाहनशुद्धीसाठी वाहनात देवतांच्या नामपट्ट्या लावतांना त्यांची रचना पुढीलप्रमाणे करावी.

 

१. चालकाच्या आसनासमोर – श्रीकृष्ण

२. चालकाच्या बाजूच्या आसनासमोर – गणपति

३. चालकाच्या मागील बाजूस डावीकडील खिडकीच्या वर – श्रीराम

४. चालकाच्या मागील बाजूस उजवीकडील खिडकीच्या वर – दत्त

५. गाडीच्या मागील बाजूस डावीकडे – देवी (दुर्गा, अंबादेवी, भवानीदेवी, रेणुकादेवी इत्यादी)

६. गाडीच्या मागील बाजूस मध्यभागी – शिव

७. गाडीच्या मागील बाजूस उजवीकडे – मारुति

 

दुचाकी वाहनास नामपट्ट्या लावण्याची पद्धत

दुचाकीच्या पुढच्या बाजूला ‘गणपति’ आणि मागच्या बाजूला ‘श्रीकृष्ण’ या देवतांच्या नामपट्ट्या लावाव्यात.

 

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

 

वास्तूशुद्धीसाठी आणि आनंदप्राप्तीसाठी ‘नाम-साधना’ करा !

नामजप केल्यामुळे व्यक्‍तीची सात्त्विकता वाढते आणि व्यक्‍तीतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक स्पंदनांमुळे वास्तूही शुद्ध होते. यासाठी प्रतिदिन नेहमीच्या पूजाअर्चादी धर्माचरणाच्या जोडीलाच नामजप-साधना करा. याचबरोबर दिवसातील ठराविक वेळ घरातील सर्वांनी एकत्र येऊन मोठ्याने नामजप करणे, हेही वास्तूशुद्धीसाठी लाभदायक आहे.

 

शेवटी कृतज्ञता व्यक्त करावी !

वास्तूशुद्धी पूर्ण झाल्यावर उपास्यदेवता आणि वास्तूशुद्धीला साहाय्यभूत झालेल्या वस्तू यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.

नामजप कसा आणि कोणता करावा’, याविषयीची सविस्तर माहितीसाठी येथे पहा !

Leave a Comment