रामराज्यात शिक्षण कसे होते ?

श्रीरामाने स्वतंत्र शिक्षण देऊन घराघरात श्रीराम निर्माण करणे

Ram_banner

रामराज्यात आर्थिक योजनेसोबत उच्च प्रतीचे राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केले होते. त्या वेळचे लोक निर्लोभी, सत्यवादी, अलंपट, आस्तिक आणि कृतीशील होते. क्रियाशून्य नव्हते. त्याकाळी लोक स्वतंत्र होते. कारण, शिक्षण स्वतंत्र होते, शिक्षण राज्याश्रित आणि वित्ताश्रित नव्हते. शिक्षण आणि शिक्षण देणारे दोन्ही पराधीन (गुलाम) असतील, तर त्या शिक्षणातून काय निर्माण होणार ? जे पेरलेले असते तेच उगवते. त्यात भेद होणार नाही.

जेथे शिक्षण राज्याश्रित किंवा वित्ताश्रित असेल, तेथे कधी काळी स्वतंत्र श्‍वासोच्छ्वास नसेल. तेथे राष्ट्रीय चारित्र्याचे पुनरुत्थान नसेल.

 

लोकांना विशिष्ट शिक्षण मिळाल्याने राष्ट्रीय चारित्र्य उभे राहिले !

माणसाला केवळ कर्तव्यपरायणच नाही, तर लोभविवर्जितही बनवण्यात आले होते. आपण एकच कर्तव्याचा घोष करीत असतो; पण कर्तव्यपरायणता येत नाही. म्हणून श्रीरामाने लोकांना विशिष्ट शिक्षण देऊन राष्ट्रीय चारित्र्य उभे केले होते.

संदर्भ : व्यासविचार, नववा स्कंध