विदेशातील ओढे, सरोवर, नद्या इत्यादी पाण्याचे स्रोत, तसेच समुद्र यांचे पाणी रक्तासारखे लाल होणे

वर्ष २०१० पासून लाल रंगाचा पाऊस पडण्यामागील, तसेच जगभरातील
नद्या, तळी, समुद्र यांतील पाण्याचा रंग लाल होण्यामागील आध्यात्मिक कारणे

अलीकडे म्हणजे साधारण वर्ष २०१० पासून जगभरातील नद्या, तळी, समुद्र यांच्या पाण्याचा रंग लाल झाल्याने, तसेच लाल रंगाचा पाऊस पडत असल्याने खळबळ माजली आहे. काही नद्यांमधील पाणी रातोरात लाल झाल्याने त्यांचे ओढे, तसेच त्या ज्या समुद्राला मिळतात, ते समुद्रही लालभडक झाले आहेत. याविषयी शास्त्रज्ञांची विविध मते असून त्यातून निष्कर्ष काढणे किंवा त्याचे खरे कारण सांगणे शक्य झालेले नाही. लाल शेवाळे, प्रदूषण, मिठाचे मोठ्या स्वरूपात केंद्रीकरण होऊन त्याचे रूपांतर मिठाच्या थरात झाल्यामुळे एरव्ही निळे दिसणारे पाणी गडद लाल होणे आणि हवामानातील पालट अन् महासागराचे आम्लीकरण या काही तात्त्विक भागांवर संशोधन चालू आहे.

१. पाणी लाल होणे, ही घटना येणार्‍या भीषण काळाची सूचक !

काही लोकांच्या मते ही घटना येणार्‍या भीषण काळाची सूचक आहे. पाणी लाल होण्याचा हा प्रकार जगभरातील अधिकाधिक जलाशयांमध्ये पसरत आहे. त्यामुळे अशा पाण्यातील मासे आणि पक्षी सहस्रोंच्या संख्येत मरत आहेत. या प्रकाराला लाल प्रवाह असेही म्हटले जात असून अशा घटना बहुतांश करून नदीच्या मुुखाजवळ किंवा समुद्रकिनारी घडतात. असेे ताज्या पाण्याच्या संदर्भातही घडतांना आढळत आहे.

२. देश-विदेशातील लाल पाणी झालेले जलाशय

मास आणि वर्ष

देश जलाशयाचे ठिकाण जलाशयाचे /नदीचे / समुद्राचे नाव पाण्याचा स्रोत / जलाशयाचा प्रकार
१. २५.७.२००१ भारत कोट्टायम/इडुक्की पाऊस
२. २९.६.२००५ इराक सद्र शहर सद्र सिटी लेक तळे
३. जुलै २००६ भारत केरळ पाऊस
४. जुलै २००७ भारत केरळ पाऊस
५. जुलै २००८ भारत केरळ पाऊस
६. १०.९.२००९ अमेरिका ब्लॅक स्टोन, बॉस्टन ब्लॅक स्टोन रिव्हर नदी
७. १.८.२०११ अमेरिका ओ सी फिशर ओ सी फिशर लेक तळे/धरण

८. १६.२.२०१२

लेबनन

फर्न अल् शब्बक

बेरुट रिव्हर

नदी

९. ४.६.२०१२ सिनेगल रेतबा लेक रेतबा तळे
१०. ५.७.२०१२ भारत कन्नूर पाऊस
११. २५.७.२०१२

युक्रेन

बॅद्रियांस्क

आझोव्ह

समुद्र

१२. ७.९.२०१२ चीन चाँगकिंग यांग्त्से रिव्हर नदी
१३. १७.११.२०१२ पूर्व श्रीलंका सेवांगला पाऊस
१४. २७.११.२०१२ ऑस्ट्रेलिया सिड्नी बोंडाय बीच आणि सभोवतालचे बीच समुद्र
१५. ११.१.२०१३ नेदरलॅण्ड ब्लू हॅरन् ब्लू हॅरन् कॅनाल नाला
१६. १९.६.२०१३ ऑस्ट्रेलिया हिलियर
लेक
हिलियर तळे
१७. ९.८.२०१३ फ्रान्स कमार्ग कमार्ग लेक तळे
१८. १९.८.२०१३ कझाकिस्तान कराघंद कराघंद बर्फ
१९. ३.१२.२०१३ स्लोवाकिया मियावा नदी
२०. ६.१.२०१४ युके नॉर्थहॅम्टन थोर्पलॅण्डस् येथील ओढा ओढा
२१. ३०.४.२०१४ स्विट्झर्लन्ड बर्न ळॉ नदी
२२. माहिती उपलब्ध नाही ऑस्ट्रेलिया हट् लगून हट् लगून तळे
२३. स्पेन सालिनाझ् द तोर्वे सालिनाझ् द तोर्वे तळे
२४. तांझानिया नॅट्रॉन नॅट्रॉन तळे

३. पाणी लाल होणे, ही आगामी महायुद्धाची नांदी !

एखाद्या घटनेचे स्पष्टीकरण आपण करू शकलो नाही, तर त्याचे मूळ कारण आध्यात्मिक असण्याची शक्यता दाट असते. जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असून युद्धाचा बहुतांश भाग हा सूक्ष्म स्तरावर होणार आहे; मात्र त्याचा अंशात्मक भाग पृथ्वीवर होणार असून मानवजातीला त्याचे भीषण परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे जागतिक समस्या वाढणे, नैसर्गिक आपत्ती ओढवणे यांसारख्या गोष्टी घडून शेवटी त्यांचे रूपांतर तिसर्‍या महायुद्धात होणार आहे.

विदेशातील ओढे, सरोवर, नद्या इत्यादी पाण्याचे स्रोत, तसेच समुद्र यांचे पाणी
रक्तासारखे लाल झाल्याने नागरिक आश्‍चर्यचकित, तर वैज्ञानिकांची मती गुंग होणे

अ. लाल पाऊस

१. श्रीलंकेत १५ मिनिटे पडला लाल पाण्याचा पाऊस !

१४ आणि १५.११.२०१२ या दिवशी सकाळच्या वेळी जवळजवळ १५ मिनिटे श्रीलंकेतील सेवांगला, मोनारागला आणि मनंपितिया पोलान्नरूवा येथे लाल पाण्याचा पाऊस पडला. तेथील वेधशाळेने या मुसळधार पावसाचे कारण कळले नसल्याचे सांगितले. गेल्या वर्षी, म्हणजे २०११ मध्ये भारतातही असा पाऊस पडला असून भारतीय वैज्ञानिकांनी याचे कारण शोधले असता त्यांना विविध प्रकारचे अती सूक्ष्म जीव असल्याचे लक्षात आले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे या अती सूक्ष्म जिवांना डी.एन्.ए. नाहीत. – दैनिक रिड्मा डिस्नायके, श्रीलंका, १६.११.२०१२

२. समुद्र लाल होणे


२ अ. आझोव्ह समुद्र रक्ताप्रमाणे लाल होणे

बॅद्रियांस्क गावाजवळील अझोव्ह समुद्राचे पाणी लाल झाल्याने तेथील नागरिक आणि शास्त्रज्ञ गोंधळलेले आहेत, असे इंग्लिश रशिया या ऑनलाईन नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या मागचे कारण नजिकच्या कारखान्यांतून येणारे सांडपाणी असल्याची अटकळ गावकरी व्यक्त करतात, तर हे येणार्‍या भयंकर काळाचे संकेत असल्याचे वृद्ध मंडळी सांगतात; मात्र हा लाल रंग शेवाळ्याच्या लालपणामुुळे आला असण्याची शक्यता असून त्यामुळे मानवजातीला कोणताही धोका नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. – द वॉचर्स २९.७.२०१२


२ आ. लाल शेवाळे आल्यामुळे सिड्नी येथील समुद्रकिनारे नागरिकांसाठी बंद !

लाल शेवाळे आल्यामुळे ते जाईपर्यंत सिड्नी येथील बोंडायसह अनेक लोकप्रिय समुद्रकिनारे नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहेत. लाल शेवाळ्याच्या संपर्कात येणेे धोकादायक ठरू शकत असल्याने, तसेच त्यामुळे त्वचेचे विकार आणि डोळ्यांची जळजळ होण्याची शक्यता असल्याचे रॅण्डविक् काऊन्सिलच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. – न्यूज.कॉम.एयु, २७.११.२०१२

आ. नद्या लाल होणे


१. यांग्त्से नदी लाल होणे

सोनेरी पाणी या नावानेे प्रसिद्ध असलेल्या चीनमधील सर्वांत लांब आणि मोठी, तसेच जगात तिसर्‍या क्रमांकाची लांब नदी असलेल्या यांग्त्से नदीचे पाणी लाल झाले असून अधिकार्‍यांना त्याचे कारण कळू शकले नाही. ही नदी चाँगकिंग या शहराजवळ जालिंग नदीला मिळत असलेल्या ठिकाणचे पाणी लाल झाले आहे. – एबीसी न्यूज, ७.९.२०१२


२. स्लोवेकन् नदी रातोरात लाल झाल्याने नागरिकांना धक्का !

झेक् रिपब्लिकच्या सीमारेषेवर असणार्‍या मियावा या शहरातून वाहणार्‍या नदीचे पाणी रातोरात लाल झाले. याचा शोध लावण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे; मात्र येथील कत्तलखान्याच्या गाळण्याच्या पद्धतीत बिघाड निर्माण झाल्याने पाणी लाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. – मेल ऑन लाईन, ३.१२.२०१३

३. बेरूट नदी लाल होणे

बेरूट नदीचे उगमस्थान असलेल्या फर्न अल् शब्बक येथील नाल्याचे पाणी लाल झाल्याने सर्व शासकीय आणि स्थानिक अधिकारी त्याची पाहणी करण्यासाठी तेथे पोहोचले; मात्र त्या लाल पाण्याचा उगम त्यांच्या लक्षात येऊ शकला नाही. – द डेली स्टार, लॅबनान, १५.२.२०१२

४. नॉर्थहॅम्पशायर येथील ओढा लाल होणे

नॉर्थहॅम्पशायर, यु.के. येथील ओढ्याचे पाणी लाल झाले आहे. आरंभी नदीत शाई पडल्याचे म्हटले असले, तरी याचे मूळ कारण कळू शकलेले नाही. – टर्नर रेडियो नेटवर्क, ३०.४.२०१४

४. वाढत्या सामाजिक अस्थिरतेमागे वाईट शक्ती कार्यरत असून
त्या जगभरातील लोकांच्या मनावर नियंत्रण मिळवून सर्वत्र कलह निर्माण करत असणे

या सूक्ष्म-युद्धाच्या मागे पाताळातील बलाढ्य वाईट शक्ती असून ते पृथ्वीतलावरील सात्त्विकता नष्ट करून रज-तमाचे प्रमाण वाढवू इच्छितात. एकदा रज-तमाचे प्रमाण वाढले की, निसर्गाचे संतुलन बिघडते आणि त्याचे पर्यवसान युद्ध अन् नैसर्गिक आपत्ती यांमध्ये होते. वाढलेल्या रज-तम वातावरणात युद्धासारखे प्रसंग तत्काळ निर्माण करणे वाईट शक्तींना सोपे जाते.

वर्ष २०१३-२०१४ मध्ये आपण अनुभवत असलेली सामाजिक अस्थिरता, युद्धसदृश स्थिती, तसेच येणार्‍या काळात त्याची वाढणारी भीषणता यांमागे प्रामुख्याने वाईट शक्ती कार्यरत आहेत. त्या जगभरातील लोकांच्या मनावर नियंत्रण मिळवून त्यांच्या माध्यमातून सर्वत्र कलह निर्माण करत आहेत. सूक्ष्मातून चालणार्‍या या युद्धामध्ये पृथ्वीवरील सात्त्विकता नष्ट करून स्वतःची शक्ती वाढवण्याची एकही संधी वाईट शक्ती सोडत नाहीत.

५. जलाशयातील पाणी लाल होण्यामागचे मूळ कारण ५ व्या पाताळातील वाईट शक्ती !

जलाशयातील पाणी लाल होण्यामागचे मूळ कारण ५ व्या पाताळातील वाईट शक्ती आहे. यामुळे त्रासदायक शक्तींत वाढ होते, तसेच हे होणार्‍या तिसर्‍या महायुद्धाचेही सूचक आहे. जगभरच्या जलाशयातील पाणी लाल होण्यामागील मूळ कारणे पुढील सारणीत दिली आहेत.

५ अ. जलाशयातील पाणी लाल होण्यामागची कारणे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम

जलाशयातील पाणी लाल होण्याची कारणे प्रमाण
(टक्के)
पाणी लाल झाल्यामुळे रज-तमात झालेली वाढ (प्रमाण – टक्के) परिसरावर होणारा दुष्परिणाम (प्रमाण – टक्के)
१. स्थूल / मानवनिर्मित ३० (टीप २) १० (टीप ३)

२. आध्यात्मिक (टीप १)

७०

टीप १ : पाणी लाल होण्याचे मूळ कारण आध्यात्मिक आहे, उदा. वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती, समाजातील लोकांच्या अधर्माचरणामुळे वाढलेले रज-तम इत्यादी. पाणी लाल होण्याचे कारण लाल शेवाळे असले, तरी तेही आध्यात्मिक असल्याचे लेखातील पुढील भागात स्पष्ट केले आहे.

टीप २ : रज-तमाचे प्रमाण केवळ ५ टक्के जरी वाढले, तरी अशा घटनांमध्ये ते साहाय्यक ठरते.

टीप ३ : वाईट/त्रासदायक स्पंदनांचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढून त्यांचा परिणाम १० कि.मी. अंतरापर्यंत झालेला जाणवतो.

आधुनिक विज्ञान अशा प्रकारच्या घटना केवळ बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याला मर्यादा येतात. पाणी लाल होण्यासारख्या घटनांचे मूळ कारण हे आध्यात्मिक असल्याने आपण ते अध्यात्मशास्त्राच्या आधारानेच समजून घेऊ शकतो.

६. जलाशयातील पाणी लाल करण्याच्या वाईट शक्तींच्या पद्धती

६ अ. पद्धत १ – वाईट शक्तींनी सिद्धींच्या आधारे
त्रासदायक शक्तींचा वापर करून लाल शेवाळे निर्माण करणे

पाताळातील उच्च पातळीच्या वाईट शक्ती त्यांच्या अद्भुत शक्तींच्या (सिद्धींच्या) आधारे पाणी लाल करू शकतात. एखाद्या गोष्टीला शून्यातून आरंभ करण्यास पुष्कळ शक्ती लागते. त्यामुळे वाईट शक्ती स्वतःची साधना (शक्ती) वाया न घालवता पाणी लाल करण्यासाठी रज-तमयुक्त शेवाळे आणि मासे यांचा माध्यम म्हणून वापर करतात. शेवाळे हे मुळातच रज-तमयुक्त असते. वाईट शक्ती त्रासदायक शक्तींचा वापर करून लाल शेवाळे निर्माण करून ते त्रासदायक शक्तींनी पूर्णपणे भारित करतात. (पाण्यात आढळणार्‍या या वनस्पतींची संख्या वाढत असून त्यांचा पाण्यातील संचयही दिवसेंदिवस वाढत आहे.) स्वतःच्या वाढीबरोबरच ते पाण्यातील त्रासदायक शक्ती आणि त्रासदायक स्पंदने वाढवण्यासही साहाय्य करतात.

६ आ. पद्धत २ – मासे आणि पाण्यात रहाणारे अन्य रज-तमयुक्त
प्राणी यांच्यावर नियंत्रण मिळवून त्यांचा माध्यम म्हणून वापर करणे

वाईट शक्ती मासे, तसेच पाण्यात रहाणारे अन्य रज-तमयुक्त प्राणी यांच्यावर नियंत्रण मिळवतात आणि पाणी लाल करण्यासाठी त्यांचा माध्यम म्हणून वापर करतात. मासे पाण्यात जलद गतीने भ्रमण करत असल्यामुळे त्यांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर त्रासदायक स्पंदने पसरवणे सहज शक्य होते. वनस्पती किंवा जलप्राणी यांची उत्पत्ती होत असतांनाच वाईट शक्ती त्यांना त्रासदायक शक्तींनी भारित करतात. माशांच्या केवळ श्‍वासोच्छ्वासानेही त्रासदायक शक्तींच्या लहरी पुष्कळ प्रमाणात पाण्यात पसरवल्या जातात. अशा प्रकारे त्रासदायक शक्तींद्वारे पाणी दूषित करून वाईट शक्ती अप्रत्यक्षपणे लोकांवर आक्रमण करतात; कारण लोक त्रासदायक शक्तींनी भारित झालेले मासे खातात.

अशा प्रकारे पाण्यातील वनस्पती आणि प्राणी यांचा वापर करून वाईट शक्ती जलचरांमध्ये त्रासदायक शक्ती वाढवतात.

६ इ. पद्धत ३ – ढगांवर आक्रमण करून पाऊस पाडणे

अद्भुत शक्तींच्या (सिद्धींच्या) आधारे पाताळातील वाईट शक्ती ढगांवर आक्रमण करून लाल पाऊस पाडतात. केरळ, दक्षिण भारत आणि श्रीलंका या ठिकाणी असा पाऊस पडला आहे. केरळ येथे पडलेल्या पावसाच्या पाण्यातील सूक्ष्मातिसूक्ष्म कण शास्त्रज्ञांना आजपावेतो कधी ज्ञात नाहीत. प्रत्यक्षात ते कण पाताळातील वाईट शक्तींनी निर्माण केलेे आहेत. ३०० डिग्री सेल्सिअस एवढ्या तीव्र तापमानातही या कणांचे जलद प्रतिरूपण (रॅपिड रेप्लिकेशन) शक्य आहे.


६ इ १. चित्राचे विवरण : छायाचित्रात केरळ येथे पडलेल्या लाल पावसाच्या पाण्यातील कण सूक्ष्मदर्शित्राच्या (मायक्रोस्कोपच्या) साहाय्याने दाखवले आहेत.

अ. केरळ येथे पडलेल्या लाल पावसातील कण. (संदर्भ : विकिपेडिया)

आ. ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या साहाय्याने एक कण पाहिला असता त्यातून विलग झालेला कोश पाहू शकतो. (संदर्भ : विकिपेडिया)

इ. अगदी जवळून पाहिले असता आपल्याला त्यात तोंडवळा दिसतो. वाईट शक्ती एखाद्या गोष्टीवर आक्रमण करतात, तेव्हा त्यांचा आकार उमटतो.

६ ई. पद्धत ४ – कण किंवा अती सूक्ष्म जीव यांत पालट घडवणेे

पृथ्वीवर त्रासदायक शक्तीच्या लहरी पसरवण्यासाठी वाईट शक्ती कण किंवा अती सूक्ष्म जीव यांमध्ये पालट घडवून लाल पाऊस पाडतात. असे कण किंवा अती सूक्ष्म जीव निर्माण करण्यात वाईट शक्तींची शक्ती (साधना) अधिक प्रमाणात व्यय होत असल्यामुळे ते तसे करत नाहीत; मात्र अस्तित्वात असलेले कण किंवा अती सूक्ष्म जीव यांत पालट करून किंवा त्यांच्या गुणधर्मामध्ये आमूलाग्र फेरफार करून ते नवीन असल्याप्रमाणे भासवतात.

६ उ. पद्धत ५ – पंचतत्त्वांंचा उपयोग करणे

पृथ्वीतलावर विध्वंस घडवून आणण्यासाठी वाईट शक्ती त्यांच्या सिद्धींद्वारे पंचतत्त्वांचाही उपयोग करतात. मानवाचे शरीर अधिकतर पृथ्वी आणि आप तत्त्वांनी बनलेले असल्याने मानवजातीला नष्ट करण्यासाठी वाईट शक्ती या तत्त्वांचा अधिकाधिक उपयोग करतात. त्रासदायक लहरींचे प्रसरण सहजपणे होत असल्याने वाईट शक्ती वायूतत्त्वाचाही मोठ्या प्रमाणात उपयोग करतात.

जलाशयांचे पाणी त्रासदायक लहरींनी युक्त आणि लाल केल्याने वाईट शक्तींना त्या जलद गतीने पसरवणे शक्य होते; मात्र या पाण्याचे बाष्पात रूपांतर झाले, तर या त्रासदायक लहरींचे प्रसरण सर्वदूर होणे शक्य होते. त्याचप्रमाणे त्रासदायक लहरींनी युक्त अशा जलाशयाच्या तळावरही त्याचा परिणाम होतो.

रज-तम वाढण्यास पोषक वातावरण असणार्‍या ठिकाणी वाईट शक्ती अधिक प्रमाणात कार्यरत असतात. शेवटी ही सर्व ठिकाणे त्रासदायक शक्तींचे भांडार बनून तिसर्‍या महायुद्धासाठी पोषक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

७. आक्रमणासाठी वापरण्यात येणारे रंग आणि आक्रमणाचे स्वरूप

७ अ. काळ्या शक्तींचे रूपांतर मायावी लाल रंगात करणे

आक्रमणाच्या शृंखलेतील हा पहिला टप्पा आहे. वाईट शक्ती त्यांच्या काळ्या शक्तींचे रूपांतर मायावी लाल रंगात करतात. या रंगाचा लोकांवर स्थूल स्तरावरील दुष्परिणाम होतो. त्यामुळे विविध शारीरिक आजार उद्भवतात, उदा. श्‍वास घेण्यास त्रास होेणे, प्राणशक्ती अल्प होणे, दुर्धर आजार होणे इत्यादी. त्यामुळे लोकांची कार्यक्षमता अधिक प्रमाणात उणावते.

७ आ. लोकांना मानसिक स्तरावर त्रास देण्यासाठी मायावी हिरवा रंग वापरणे

वर्ष २०१६ मध्ये होणार्‍या दुसर्‍या टप्प्यात वाईट शक्ती मायावी हिरव्या रंगाच्या माध्यमातून आक्रमण करतील ! त्या वेळी समुद्र, नदी, तळे इत्यादींतील पाणी गडद हिरवे दिसेल. या मायावी हिरव्या रंगाचा उपयोग लोकांना मानसिक स्तरावर त्रास देण्यासाठी होईल. या टप्प्यात हत्या, बलात्कार आणि रक्तपात यांत वाढ होईल ! (२३.१.२०१४ या दिवशी डोंबिवली (मुंबई) येथे हिरवा पाऊस पडला.)

७ इ. तपकिरी रंगाच्या माध्यमातून मानवाच्या शरिरावर पूर्ण नियंत्रण मिळवणे

याच्या पुढच्या टप्प्यात, म्हणजे वर्ष २०१७ मध्ये जलाशयातील पाण्याचा रंग तपकिरी होईल आणि पाऊसही तपकिरी रंगाचा असेल. या रंगाच्या माध्यमातून वाईट शक्तीने मानवाच्या शरिरावर पूर्ण नियंत्रण मिळवल्याने मानवाचेे अस्तित्व नष्ट होईल आणि तो वाईट शक्तीचा कळसूत्री बाहुला बनेल. वाईट शक्ती माणसाचे मन विकृत करतील आणि प्रत्यक्षात स्थूल रूपात वावरतील. ते राष्ट्र आणि धर्म यांवर संकटे आणतील आणि संत अन् चांगली माणसे यांचा छळ करतील.

७ ई. काळ्या रंगाच्या माध्यमातून आक्रमण करणे

आक्रमणाच्या या शेवटच्या टप्प्यात, म्हणजे वर्ष २०१८ नंतर काळ्या रंगाच्या माध्यमातून युद्धामुळे होणार्‍या मोठ्या प्रमाणातील विध्वंसाला आरंभ होईल. २०१८ नंतरचा काळ विनाशाचा असून तेव्हा समुद्राचे पाणी काळपट होईल आणि काळा पाऊस पडेल. राष्ट्र आणि धर्म यांसाठी तो काळ घातक असेल.

८. जलाशयाचे पाणी लाल होणे टाळता येईल का ?

संपूर्ण मानवजातीने अधिकाधिक सात्त्विक जीवनशैली अंगीकारून धर्माचरण केल्यास जगभरातील रज-तमाचे प्रमाण उणावून सत्त्व गुणाची वृद्धी होईल. त्यासाठी साधना आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलनासाठी प्रयत्न करावेत. पालट घडवण्यासाठी व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधना अत्यावश्यक आहे. असे केल्याने अशा प्रकारच्या नैसर्गिक घटना उणावतील. साधनेचे महत्त्व आणि साधना करण्याची आवश्यकता इतरांना सांगून भूतलावरील एकूण सात्त्विकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आम्ही आमच्या सर्व वाचकांना आवाहन करत आहोत.

Leave a Comment