|
|
||||
कुठे महान हिंदुसंस्कृती, तर कुठे संस्कृतीहीन पाश्चात्त्य !१. सायंकाळी लक्ष्मी घरात येते, या भावाने हिंदु देवासमोर दिवा लावून आरती, प्रार्थना व श्लोक म्हणतात, तर पाश्चात्त्य संध्याकाळी दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहात बसतात ! २. हिंदु अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करत असल्याने ताटात अन्न टाकत नाहीत, तर पाश्चात्त्य अन्न ताटात टाकण्याला शिष्टाचार (मॅनर्स) समजतात ! पवित्र गंगाजलामुळे पाश्चात्त्यांनाही हिंदु संस्कृतीचे महत्त्व पटले !१८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आम्ही रानटी अवस्थेतून नुकतेच बाहेर पडत होतो.त्या काळाच्याही फार पूर्वी हिंदूंची उच्च संस्कृती होती. - सुप्रसिद्ध अमेरिकन नट मार्क ट्वेन विश्वाच्या उत्पत्तीचा विचारहल्ली शोधलेले विश्वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १० व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्तातील सिद्धान्तांशी जुळतात ! खगोलशास्त्रावर प्रभुत्वअसंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२००० वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे ! कोठे हजारो वर्षे पर्यावरणाचा समतोल राखणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कोठे गेल्या शंभर वर्षातच पर्यावरणारा र्हास करणारे आधुनिक विज्ञानसनातनची सात्त्विक उत्पादने१. ग्रंथ - देवीपूजनाशी संबंधित शास्त्र२. ग्रंथ - पूजासाहित्याचे महत्त्व काय?३. ग्रंथ - सण, धार्मिक उत्सव व व्रते
५. ग्रंथ - देवघर व पूजेतील उपकरणे६. ध्वनीचित्रतबकडी - धार्मिक कृती कशा कराव्यात७. ध्वनीचित्रतबकडी - सनातन धर्मसत्संगवितरणासाठी संपर्क
|
मकरसंक्रांतमकरसंक्रांतीच्या काळात तीर्थस्नान केल्याने महापुण्य मिळते व तिळाचा उपयोग केल्याने पापक्षालन होते !![]() प.पू. डॉ. काटेस्वामीजीमकरसंक्रांतीच्या काळात तीर्थस्नान केल्याने महापुण्य मिळणे व तिळाचा उपयोग केल्याने पापक्षालन होणे मकरसंक्रांत `सूर्य ज्या दिवशी मकर राशीत
प्रवेश करतो, तो दिवस म्हणजे मकरसंक्रांत. मकरसंक्रांतीपासून उत्तरायण सुरू
होते. उत्तरायणाचे सहा महिने पुण्यकाळातील विधी - ध्वनिचित्रपट
संक्रांतीदेवी ज्याचा स्वीकार करते, त्यांचा नाश होतो. या दिवशी तिळाचे तेल
व उटणे अंगाला लावणे, तीळमिश्रित जलाने स्नान करणे, तीळमिश्रित पाणी पिणे,
तीळहोम करणे, तिळाचे दान करणे, या सहा पद्धतीने तिळाचा उपयोग करणार्यांची
सर्व पापे नष्ट होतात. संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे,
वृक्ष व गवत तोडणे आणि कामविषय सेवन करणे ही कृत्ये कटाक्षाने वर्ज्य
करावीत. नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तीळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने व
भूमि यांचे यथाशक्ति दान द्यावे. या दिवशी सुवासिनी दान देतात. काही
पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात व त्यांना तीळगुळ देतात. मकरसंक्रांत साधनेसाठी पोषक काळमकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याच्या उत्तरायणामुळे ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने ब्रह्मांडात रज-सत्त्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असल्याने, हा काळ साधना करणार्यांना जास्त पोषक असणे ![]() कर्कसंक्रांतीपासून मकरसंक्रांतीपर्यंतच्या काळाला
दक्षिणायन म्हणतात. सूर्याचे दक्षिणायन सुरू होणे, यालाच ब्रह्मांडाची
सूर्यनाडी कार्यरत होणे असे म्हणतात. ब्रह्मांडाची सूर्यनाडी कार्यरत
झाल्याने सूर्याच्या दक्षिणायनामध्ये ब्रह्मांडात रज-तमात्मक लहरींचे
प्रमाण अधिक असते. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते.
सूर्याचे उत्तरायण सुरू होणे, यालाच ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत होणे
असे म्हणतात. ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या
उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज-सत्त्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते.
त्यामुळे हा काळ साधना करणार्यांना पोषक असतो. ब्रह्मांडाची चंद्रनाडी
कार्यरत असल्याने या काळात वातावरणही नेहमीपेक्षा अधिक शीतल असते. या काळात
तीळभक्षण करणे अधिक लाभदायक असते. तिळाच्या तेलात सत्त्वलहरी ग्रहण करण्याची
क्षमता अधिक असते, शिवाय तीळभक्षण केल्याने शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होते.
त्यामुळे जीव वातावरणाशी पटकन जुळवून घेऊ शकतो; कारण त्या वेळी
ब्रह्मांडाचीही चंद्रनाडीच कार्यरत असते. जिवाच्या शरीरातील वातावरण व
ब्रह्मांडाचे वातावरण एक झाल्याने साधना करतांना जिवाला कोणत्याही प्रकारचा
अडथळा येत नाही. - श्री गुरुतत्त्व (१४.१.२००४, दुपारी ३.३३) मकरसंक्रांतीला हळदी-कुंकू करण्याचे व तेव्हा देण्यात येणार्या वाणाचे महत्त्वहळदी-कुंकू - ध्वनिचित्रपट
मकरसंक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाची सुरुवात
हळद-कुंकू लावणे : हळद-कुंकू लावणे, म्हणजे दुसर्या जिवातील श्री
दुर्गादेवीची अप्रकट शक्ती जागृत करणे व तिला भक्तीभावाने आवाहन करून तिची
कृपादृष्टी संपादन करणे होय. सनातन धर्मात काळया रंगाला अशुभ रंग मानलेले असले, तरी मकरसंक्रांतीच्या दिवशी काळा रंग वापरण्याची परवानगी सनातन धर्माने दिलेली असणेमकरसंक्रांतीच्या दिवशी काळा रंग वापरण्याची परवानगी का आहे? - ध्वनिचित्रपट
सनातन धर्मात काळया रंगाला अशुभ रंग मानले आहे; कारण या रंगामध्ये
वातावरणातील तमोकण ग्रहण करण्याची क्षमता सर्वांत जास्त असते; परंतु
मकरसंक्रांतीच्या दिवशी काळया रंगाचे वस्त्र घातले, तरी त्या वस्त्राचा
आपल्याला त्रास होत नाही; कारण या दिवशी वातावरणात रज-सत्त्वकणांचे
प्राबल्य असते. त्यामुळे याच दिवशी काळा रंग वापरण्याची परवानगी आपल्याला
सनातन धर्माने दिली आहे. यावरून सनातन धर्माने ठरवलेली प्रत्येक गोष्ट ही
अध्यात्मशास्त्राला किती धरून आहे, याची साक्ष पटते. - श्री गुरुतत्त्व
(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून १४.१.२००४, दुपारी ३.३३)
संक्रांतीच्या दिवशी केल्या जाणार्या बोरन्हाणामागील शास्त्र
मकरसंक्रांत ते रथसप्तमी या काळात सुनेचे तिळवण, जावयाचे प्रथम वाण, बाळाचे
बोरवण करतात. सुनेला, जावयाला व बाळाला हलव्याचे दागिने करतात. बोरन्हाणामागील शास्त्र - ध्वनिचित्रपट
१. कृति : `मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणार्या मकर संक्रांतीच्या
दिवशी आप्तेष्टांच्या मुलांना बोलावून हा समारंभ करतात. त्यासाठी मुलाला
काळे झबले शिवतात. त्यावर खडी काढतात किंवा हलव्याचे दाणे बसवतात. मुलाच्या
अंगावर हलव्याचे दागिने घालतात. ३. बोरन्हाणीमध्ये वापरण्यात येणार्या विविध वस्तूंतील मधुरतेचे प्रमाण व त्यांच्याकडे आकृष्ट होणारे देवतेचे तत्त्व
२. भोगीच्या दिवशी सुपात वाण दिले जाते. त्यामागील शास्त्र काय ? मकरसंक्रांतीविषयी ईश्वराकडून प्राप्त झालेले ज्ञानपौष महिना शुभकार्यासाठी वर्ज का मानला जातो ? `पौष महिन्यात दक्षिण दिशा ही विशेषत: प्राबल्यासहित कार्य करत असते. ज्या वेळी ब्रह्मांडात यमलहरींचे प्राबल्य अधिक असते, त्या वेळी यमलहरी घनीभूत करून ठेवण्याचे कार्य दक्षिण दिशा करत असते. या यमलहरींना धरून अनेक अतृप्त आत्मे भूमंडलात वास करून आपल्या प्रभावी रज-तमात्मक दर्शक हालचालींनी वायूमंडल भारीत करत असतात. अशा भारीत वायूमंडलामुळे शुभदर्शक कृतींमध्ये वाईट शक्तींचा अडथळा येण्याचीच शक्यता अधिक असल्याने पौष महिना शुभदर्शक कृतींसाठी वर्ज्य मानला जातो.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.१.२००८, रात्री ११ ) करिदिन वाईट का मानला जातो ? `करिदिनादिवशी ब्रह्मांडात तमोगुणी लहरींचे अधिक्य वाढण्यास सुरुवात होते. हे अधिक्य तत्त्वस्वरूपी वाढत असतांना या भारीत वायूमंडलात केल्या जाणार्या कृती रज-तमात्मक लहरींच्या निर्मितीला पुष्टी देणार्या असतात. संक्रातीच्या दिवशी रज-सत्त्वातील सत्त्वलहरींचे प्रमाण करिदिनादिवशी कमी होण्यास सुरुवात झाल्याने तमोगुणाचे प्राबल्य सूक्ष्म रूपात वाढण्यास प्रारंभ होऊ लागतो. हा काळ वाईट शक्तींच्या निर्मितीजन्य हालचालीसही पोषक असल्याने तो वाईट समजला जातो.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.१.२००८, रात्री ११.१५) संक्रांतीनिमित्तचे हळदीकुंकू रथसप्तमीपर्यंतच का करतात ? `रथसप्तमीपर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदीकुंकू केले जाते. त्यानंतर हळूहळू तेजाचे प्राबल्य कमी होऊ लागल्याने प्रत्येक कृतीत वाईट शक्तींचे अडथळा येण्याचे प्रमाण वाढते व त्यामुळे विधीतून मिळणार्या पुण्यदर्शक फलप्राप्तीचे प्रमाणही कमी होते. म्हणून तेजाच्या मारक तत्त्वास पुष्टी देणार्या व आदिशक्तीरूपी तेजाला आवाहन करणार्या हळदीकुंकूरूपी धार्मिक उपासनात्मक कृती रथसप्तमीपर्यंतच केल्या जातात.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ९.१.२००८, रात्री ११.२५) सोन्याच्या हिरेजडित रथात सूर्यदेव बसलेला दिवस म्हणजेच `रथसप्तमी' रथसप्तमीविषयी मिळालेले ज्ञान येथे देत आहोत. सूर्यदेवाला साधना करतांना स्थिर उभे रहायला लागल्याने उभे राहून त्याला त्याची गती सांभाळता येईना. त्याचे पाय दुखू लागले व त्यामुळे त्याची साधना नीट होईना. तेव्हा त्याने परमेश्वराजवळ त्याबद्दल तक्रार केली व बसण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगितले. `मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळणार\', अशी त्याने परमेश्वराजवळ विचारणा केली. तेव्हा परमेश्वराने सूर्यदेवाला बसण्यासाठी सात अश्व (घोडे) असलेला सोन्याचा हिरेजडित रथ तयार करून दिला. ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथात बसला, तो दिवस म्हणजे `रथसप्तमी'. याचा अर्थ `सात घोड्यांचा रथ'. - ब्रह्मतत्त्व (सौ. कविता पाटील यांच्या माध्यमातून, ९.१.२००४ सायं. ७.४५) सूर्यदेवाने तहानलेल्या अश्वांना पाणी पाजलेल्या मडक्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे संक्रांत
सूर्यदेवाने जास्तीतजास्त उष्णता देऊन पृथ्वीवरील बर्फ
वितळवण्यासाठी साधना (तपश्चर्या) सुरू केली. त्या वेळी रथाला असलेल्या
घोड्यांना सूर्यदेवाची उष्णता सहन न झाल्याने त्यांना खूप तहान लागली.
तेव्हा सूर्यदेवाने मातीच्या मडक्यातून पृथ्वीवरचे पाणी खेचून (विहिरीतून
घड्याने पाणी काढतात तसे) घोड्यांना प्यायला दिले. म्हणून संक्रांतीच्या
वेळी घोड्यांना पाणी पाजलेल्या मडक्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त
करण्यासाठी मातीची मडकी पूजण्याची प्रथा सुरू झाली. रथसप्तमीच्या
दिवसापर्यंत सुवासिनी हळदी-कुंकवाच्या निमित्ताने या पूजलेल्या मडक्यांचे
वाण एकमेकींना भेट म्हणून देतात. याला काळच साक्षी आहे. - ब्रह्मतत्त्व
(सौ. कविता पाटील यांच्या माध्यमातून, ९.१.२००४ सायं. ७.४५ वा.) मकरसंक्रांतीनिमित्त सनातनचे साधक दत्तात्रय पटवर्धन यांनी लिहिलेले गीत
तीळगुळापरी प्रत्येक क्षण गोड अनुभवावा ।
सनातनची सात्त्विक उत्पादने - ध्वनिचित्रपट (हिंदी)रांगोळीचे आध्यात्मिक महत्त्व - ध्वनिचित्रपट (हिंदी)दाराला तोरण लावण्यामागील आध्यात्मिक शास्त्र - ध्वनिचित्रपट (हिंदी) |
|||
|
|
||||
|
||||