गुरुवार, वैैशाख शु. चतुर्थी. सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सनातनच्या संत पू. पेठेआजी यांनी देहत्याग केला. पू. पेठेआजींच्या देहत्यागाची वार्ता सनातन परिवारात पोहोचली. आजी धर्मप्रसारासाठी सर्व दूरपर्यंत पोहोचल्या होत्या. पू. पेठेआजी कोल्हापूरला गेल्या, सांगली-मिरजला गेल्या, सिंधुदुर्गात गेल्या, मराठवाड्यात गेल्या, मुंबई-ठाणे-पनवेल तर पू. आजींच्या पायाखालील परिसर. पू. आजींना सर्व जिल्ह्यांत जाऊन धर्मप्रसार करण्याची आज्ञा झालेली असल्यामुळे पू. आजींनी ती तंतोतंत पाळली आणि त्यानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जिल्हे पादाक्रांत करता करता त्या सनातन परिवाराच्या आजी बनल्या.
विस्तारीत वृत्त...
भावार्थ : `कर्मामुळे क्रिया घडते', यातील `कर्म' म्हणजे प्रारब्ध (प्रारब्ध कर्म). `प्रारब्धामुळे क्रिया' म्हणजे कृती घडते. `क्रियेमुळे कर्म घडते', यातील `क्रिया' म्हणजे कृती व त्यामुळे `कर्म घडते' म्हणजे पुढील जन्मात भोगायचे प्रारब्ध, म्हणजे कर्मप्रारब्ध ऊर्फ संचित निर्माण होते.(संदर्भ : सनातनचे प्रकाशन `संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')
दिनविशेष
दिनविशेष : आज आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !